Farmers Protest : शेतकरी नेत्यांचा सरकारला अल्टिमेटम; …अन्यथा रेल्वे वाहतूक रोखणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दोन महिने उलटून गेले तेव्हापासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरु आहे. मात्र, 13 फेब्रुवारीपासून शंभू, खनौरी, डबवली आणि रतनपुरा बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे केंद्र सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता शेतकरी नेत्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला असून, शेतकरी आंदोलकांच्या मागण्या मान्य करा. अन्यथा रेल्वे वाहतूक रोखण्यात येईल, असा इशारा संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा या नवी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest) अग्रभागी असलेल्या शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारला दिला आहे.

तुरुंगात नेत्याची प्रकृती चिंताजनक (Farmers Protest In Delhi)

मंगळवारी (ता.16) चंदीगड येथील किसान भवनात संध्याकाळच्या सुमारास शेतकरी संघटनांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी हा अल्टिमेटम दिला आहे. यावेळी शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmers Protest) काही शेतकऱ्यांना नेत्यांना अटक करण्यात आली होती. यातील शेतकरी अनिश खतकर हे गेल्या २८ दिवसांपासून तुरुंगात आमरण उपोषण करत आहे. उपोषणामुळे खतकर यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. त्यांना काही झाल्यास त्याला हरियाणा सरकार जबाबदार असेल’, असेही शेतकरी संघटनांनी या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

शेतकरी नेत्यांच्या सुटकेची मागणी

यावेळी शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी आंदोलनाची पुढील रणनीती जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी नवदीप सिंग, अनिश खतकर आणि गुरकीरत सिंग या शेतकऱ्यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली नाही. तर शंभू सीमेवर रेल्वे रोखण्यात येईल’, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.शेतकरी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत होते. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. प्रशासनाने आंदोलकांवर कोणत्याही प्रकारची हुकूमशाही दाखवू नये’, अशी विनंती न्यायालयाला केल्याची माहितीही डल्लेवाल यांनी यावेळी दिली आहे. यावेळी तरूण शेतकरी शुभकरन सिंग याचा मृत्यू चौकशी समितीत हरियाणा पोलीस अधिकाऱ्याच्या समावेशावरून शेतकरी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!