Havaman Andaj : गेल्या काही दिवसापासून राज्यांमध्ये मान्सूनचा जोर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये पावसाचा खंड पडला असून तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज कोकणात तुरळ ठिकाणी जोरदार सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर राज्यातील कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यांना चांगला पाऊस झाला आहे. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये म्हणावा असा पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
त्याचबरोबर उर्वरित राज्यात ढगाळ स्वरूपाचे वातावरण राहणार असून पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र मध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, सातारा आणि पुणे जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुरळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडीपीसह तुरळ ठिकाणी हलका पाऊस होणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तविला आहे. (Havaman Andaj)
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर रोजच्या रोज हवामान अंदाज पाहायचा असेल तर आत्ताच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा हे ॲप इंस्टॉल केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी हवामान अंदाज पाहू शकता. त्याचबरोबर सरकारी योजना. पशूंची खरेदी विक्री, जमीन मोजणी, बाजार भाव इत्यादी गोष्टींची माहिती देखील तुम्ही पाहू शकता. तेही अगदी मोफत त्यामुळे लगेचच हे ॲप इंस्टॉल करा.
दरम्यान, राज्यभर सध्या पावसाने दडी मारली आहे. मात्र काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. पण अनेक ठिकाणी पावसाची गरज आहे. अजूनही बऱ्याच ठिकाणी म्हणावा असा पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सुरुवातीला जो पाऊस झाला त्यावरती शेतकऱ्यांनी पेरणी केली होती मात्र अद्यापही मुसळधार पाऊस झाला नसल्याने काही भागांमध्ये नदी नाले कोरडे आहेत. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.