हॅलो कृषी । करोना काळात सगळ्यांचेच नुकसान होत आहे. लॉकडाऊनमुळे सगळी दुकान, बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे अनेकांवर याचा परिणाम होत आहे. सगळ्यांना ह्या वाईट परिस्थितीतून जावे लागत आहे. अशातच शेतकऱ्यांचे देखील खूप नुकसान होत आहे. ते कष्ट करून त्यांच्या शेतात उत्पन्न घेतात पण लॉकडाऊनमुळे ते त्यांना विकता येत नाहीये. म्हणून त्यांचे खूप नुकसान होतेय. अशीच एक बातमी वर्धा जिल्ह्यातून येतेय.
वर्धा जिल्ह्यातील सेलू घोराड येथिल शेतकऱ्यांनी हंगामी पीक म्हणून भोपळ्याचे ( कोहळा) पीक घेतले. परंतु लॉकडाऊनमुळे सर्व बाजारपेठा बंद पडल्या आहेत. तसेच गावचे आठवडी बाजारही बंद आहेत. अश्या परिस्थिती हाती आलेले उत्पन्न कुठे विकावे असा प्रश्न ह्या शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे. ह्या शेतकऱ्यांचे भोपळे तोडून घरात पडले आहेत. ती तशीच घरात पडून मातीमोल होतात की काय अशी भीती शेतकऱ्यांना आहे.
बऱ्याच वेळा ही कोहळे जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन दलालाला विकली जातात. पण लॉकडाऊनमुळे भोपळ्याचे भाव देखील गडगडले आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन भोपळे विकायचे म्हटले तर खूप कमी भाव त्याला मिळतो आहे आणि त्यात येण्या जाण्याचे भाडे देखील वसूल होत नाहीये. तिथे गेल्या नंतर त्यांचे भोपळे हे 3 ते 4 रुपये किलो भावाने विकले जातात जे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नावर झालेला खर्च देखील काढून देत नाही.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा👇🏼👇🏼👇🏼*
https://chat.whatsapp.com/GkHDokKFuPu1dQERW7Urj7