पुणे : जलसंपदा विभागाचे अधिकारी यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आले. तसेच संबंधित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे.
१) उजनी धरणातून पाणी उपसा करून खडकवासला धरणाच्या नवीन मुठा उजव्या कालव्यामध्ये शेटफळ गढे जवळ सोडून त्याद्वारे पुढील भागातील सिंचन पुर्नस्थापित करणे.
२)लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेचे 7200 हेक्टर क्षेत्रासाठी तात्काळ सर्वेक्षण करून योजना कार्यान्वित करणे. pic.twitter.com/gzROkpEwsp— Dattatray Bharane (@bharanemamaNCP) April 6, 2021
खालील विषयांवर महत्वपूर्ण चर्चा
१) उजनी धरणातून पाणी उपसा करून खडकवासला धरणाच्या नवीन मुठा उजव्या कालव्यामध्ये शेटफळ गढे जवळ सोडून त्याद्वारे पुढील भागातील सिंचन पुर्नस्थापित करणे.
२)लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेचे 7200 हेक्टर क्षेत्रासाठी तात्काळ सर्वेक्षण करून योजना कार्यान्वित करणे.
३)इंदापूर तालुक्यातील लाभक्षेत्रासाठी पाणी कमी पडत असल्याने उजनी बॅक वॉटर क्षेत्रामध्ये बॅरेजेस उभारणे.
४)निरा नदीवरील उध्दट व सोमथळी या धर्तीवर खोरोची बेटात नव्याने बॅरेजेस बांधकाम करणे.
या चार विषयांवर उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीस प्रधान सचिव (जलसंपदा), सचिव (लाभक्षेत्र विकास), मुख्य अभियंता (जलसंपदा), मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प), मुख्य अभियंता (जलविज्ञान, नाशिक), महासंचालक, (मेरी, नाशिक), कार्यकारी संचालक (कृष्णा खोरे), उजनी व खडकवासला प्रकल्प संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सर्व नियोजित कामांचा आढावा घेतला व वरील सर्व कामे तात्काळ पूर्ण करण्याबाबतच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.