Jalyukt Shivar : ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ प्रभावीपणे राबवा – फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा (Jalyukt Shivar) शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या अभियानात गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारसाठी स्वयंसेवी संस्थांचा अधिकाधिक सहभाग वाढवून, त्यांच्या मदतीने अभियानाला गती देण्यात यावी. अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे आज जलयुक्त शिवार अभियान 2.0 च्या (Jalyukt Shivar) अंमलबजावणीच्या अनुषंगाने बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

या अभियानाअंतर्गत गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारद्वारे (Jalyukt Shivar) तलावातील गाळ काढण्याची तरतूद आहे. अनेक प्रकल्पातील गाळ शेतकऱ्यांनी काढून नेल्याने त्या-त्या ठिकाणची पाणीपातळी वाढण्यास मदत झाली आहे. आता यामध्ये नाला खोलीकरण आणि रुंदीकरण याचा सुद्धा समावेश करण्याच्या सूचना फडणवीस यांनी अधिकऱ्यांना दिल्या आहेत. या अभियानात पाणलोट क्षेत्र विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल, तर नवीन पदनिर्मिती करुन ही पदे भरण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, मृद व जलसंधारण विभागाचे आयुक्त सुनील चव्हाण यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी (Jalyukt Shivar Effectively Implement)

जलयुक्त शिवार अभियानाचा पहिला टप्पा अतिशय परिणामकारक पद्धतीने राबविला गेला आहे. आता या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात कृषी, मृद व जलसंधारण यासह विविध यंत्रणांचा यामध्ये सहभाग आहे. या सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि एकत्रितपणे जोमाने काम केल्यास हे अभियान यशस्वी होण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यासाठी स्थानिकांचा अधिकाधिक सहभाग घेणे, स्वयंसेवी संस्थांची मदत आणि गावपातळीवर शासकीय यंत्रणांचा प्रत्यक्ष सहभाग अशा एकत्रितपणे हे अभियान पुढे न्यावे. अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

ग्रामपंचायती मार्फत काम करावे

2015-16 ते 2018-19 मध्ये अनेक प्रकल्पातील गाळ शेतकऱ्यांनी काढून नेल्याने, त्या-त्या ठिकाणची पाणीपातळी वाढण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर शेतात हा गाळ टाकल्याने जमिनीची सुपीकता वाढली. यावर्षीही ही मोहीम अधिक गतीने राबविण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणांना दिल्या आहेत. राज्य सरकारने गाळ काढण्यासाठी 20 एप्रिल 2023 रोजी 31 रुपये प्रती घनमीटर इतका दर निश्चित केला आहे. इंधनाच्या दरात होणारी वाढ लक्षात घेऊन या दरात वाढ करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. ज्याठिकाणी स्वयंसेवी संस्था गाळ काढण्याच्या कामात सहभागी होण्यास मर्यादा असतील तेथे स्थानिक ग्रामपंचायतींना निधी देऊन ही कामे करण्याचा विचार करावा. तलावातील गाळ काढण्यासोबतच नाला खोलीकरण आणि नाला रुंदीकरण ही कामेही हाती घेण्यात यावीत, असेही निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

error: Content is protected !!