Milk Production : लम्पी आजारामुळे दूध उत्पादनास फटका; केंद्राची लोकसभेत माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जनावरांना होणाऱ्या लम्पी या आजारामुळे देशातील दूध उत्पादन (Milk Production) प्रभावित झाले आहे. या आजारामुळे देशातील दुधाळ जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेत घट झाली असून, 2022-23 या वर्षामध्ये देशातील दूध उत्पादन दर 2 टक्क्यांपर्यंत घसरल्याचे केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकासमंत्री परषोत्तम रुपाला यांनी लोकसभेत माहिती देताना म्हटले आहे. याशिवाय देशातील मिरचीच्या पिकावर यावर्षी थ्रिप्स या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे देशातील मिरची उत्पादनावर मोठा परिणाम झाला (Milk Production) आहे. असे कृषी मंत्रालयाकडून लोकसभेत सांगण्यात आले आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये लम्पी या आजारामुळे दूध उत्पादकांना (Milk Production) मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. रुपाला यांनी लोकसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी देशभरात 1.86 लाखांहून अधिक दुधाळ जनावरांचा या आजारामुळे बळी गेला आहे. तर 32.80 लाख जनावरे लम्पी आजाराने ग्रस्त झालेले आहेत. या आजारामुळे जनावरांच्या शरीरावर गाठी तयार होऊन, त्यांना ताप येतो. ही परिस्थिती उद्भवल्याने जनावरांचा प्रसंगी बळी होतो. ज्यामुळे यावर्षी देशातील दूध उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. अशी माहितीही रुपाला यांनी लोकसभेत दिली आहे. रुपाला यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, 2021-22 मधील दूध उत्पादनातील वृद्धी दर हा 5.77 टक्क्यांवरून घसरून 3.83 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. दूध उत्पादनाच्या वृद्धी दरात यावर्षी झालेली घट प्रामुख्याने लम्पी या आजारामुळे झाली आहे. असेही रुपाला यांनी म्हटले आहे.

मिरची पिकाला थ्रिप्स रोगाचा फटका (Milk Production In India)

दरम्यान, कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी एका प्रश्नावर बोलताना लेखी उत्तरात म्हटले आहे की, 2021-22 यावर्षी देशातील मिरची उत्पादनाला थ्रिप्स या रोगाचा मोठा फटका बसला. ज्यामुळे 2020-21 मध्ये असलेले 20.49 लाख टन मिरचीचे उत्पादन 2021-22 मध्ये 18.36 लाख टनांपर्यंत खाली घसरले आहे. थ्रिप्स या रोगाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आंध्रप्रदेश या राज्यामध्ये दिसून आला असून, त्याठिकाणी यावर्षी मिरची उत्पादन जवळपास निम्म्याने घटले आहे. आंध्रप्रदेशात 2020-21 मध्ये असलेले 7.97 लाख टन मिरची उत्पादन 2021-22 यावर्षी 4.18 लाख टनांपर्यंत खाली घसरले आहे. 2021-22 मध्ये आंध्रप्रदेशातील हेक्टरी उत्पादनातही 1.86 टनांपर्यंत घट नोंदवली गेली आहे. जे 2020-21 मध्ये 4 ते 5 टन प्रति हेक्टर इतके नोंदवले गेले होते.

error: Content is protected !!