मुंबई | उत्तरेत बर्फवृष्टी सुरू असल्याने शीत, बाष्मयुक्त वारे वाहून येत असल्याने कमाल व किमान तापमानात कमालीचीचढ-उतार होत आहे. गत वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत प्रथमच 10.5 अंशांवर तापमान गेल्याची नोंद वेधशाळेनं घेतली आहे. यामुळे पहिल्यांदाच आद्रतेत घट आणि गारठ्यात वाढ झाल्याने आता गल्लोगल्ली आणि गावागावांमध्ये शेकोटी पेटू लागल्या आहे. पुढील आठ दिवस असेच वातावरण राहणार असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केलाय.
राज्यात हवामान कोरडे झाले आहे. यातच उत्तर भारतात होत असलेल्या वातारणातील बदलामुळे राज्यातील थंडीतही चढ-उतार होत आहे. पुढील काही दिवस ही स्थिती अशीच राहणार आहे. त्यामुळे किमान तापमानात चांगलेच बदल होतील. त्याचबरोबर कमाल तापमानातही काही अंशी बदल होतील. राज्यातील नांदेड, मालेगाव, वर्घा, नगापूर, बीड या ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. तर यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर या ठिकाणी सरासरीच्या तुलनेत किमान तापमानाचा पारा तीन ते चार अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे या भागांत चांगलीच थंडी आहे.
कोकणात आकाश निरभ्र झाल्याने किंचित थंडी कायम आहे. त्यामुळे अलिबाग, मुंबई, रत्नागिरी, डहाणू या भागांत किमान तापमानाचा पारा १५ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव चांगलाच आहे. किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर भागांतही बऱ्यापैकी थंडी आहे.