Onion Export : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली; शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कांदा उत्पादक (Onion Export) शेतकऱ्यासांठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने देशातील कांदा निर्यातीवरील बंदी हटवली आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. इतकेच नाही तर शाह यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत, देशातून तात्काळ 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात (Onion Export) करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

3 लाख टन निर्यातीस तात्काळ मंजुरी (Onion Export Ban Lift By Government)

केंद्र सरकारने ८ डिसेंबर रोजी कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी, कांदा निर्यातबंदी (Onion Export) लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पुढील आदेश येईपर्यंत 31 मार्च 2024 पर्यंत निर्यातबंदी राहणार असल्याचे सरकारने आपल्या तत्कालीन आदेशात म्हटले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या एक रुपये आणि दोन रुपये प्रति किलोने कांदा विकला जात होता. ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सरकारवरील रोष पाहता सरकारने हा निर्यातबंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला असून, अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत तात्काळ 3 लाख टन कांदा निर्यात करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

हेही वाचा : बांग्लादेशला साखर, कांदा निर्यात होणार; दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा! (https://hellokrushi.com/agri-export-sugar-onion-to-bangladesh-discussion/)

बांग्लादेशला 50,000 टन कांदा निर्यात होणार

केंद्र सरकार आणि बांग्लादेश सरकार यांच्यात झालेल्या करारानुसार या बैठकीत बांगलादेशला 50,000 टन कांदा निर्यात करण्यास देखील मंजुरी देण्यात आली आहे. अलीकडेच बांग्लादेशच्या विदेश मंत्रालयाचे उच्चाधिकारी आणि भारतीय विदेश मंत्रालयाचे उच्चाधिकारी यांच्यात आगामी रमजानच्या सणापूर्वी 50 हजार टन कांदा निर्यातीबाबत बोलणी झाली होती. त्यास या बैठकीत अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेताना आज म्हटले आहे की, गुजरात आणि महाराष्ट्रात बाजार समित्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच एकूण 3.50 लाख टन कांदा निर्यात होणार असल्याने, कांदा दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!