हॅलो कृषी । एखाद्या व्यक्तीला एक ठराविक वयानंतर आरामात आयुष्य जगण्याची इच्छा असते, नंतर त्याला एक प्रकारचे सोपे काम करावेसे वाटते. परंतु, आपल्या देशात असे बरेच लोक आहेत ज्यांचे वय जास्त असूनही काही फरक पडत नाही. ते सतत सामाजिक कार्य करत असततात किंवा त्यांची आवड जपत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उदाहरणाबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे वय 105 वर्षे आहे आणि ज्यांचे नाव पपाम्मल आहे. हे आश्चर्यकारक आहे की, आज पपाम्मल 100 वर्षांहून अधिक वयाच्या झाल्या आहेत, परंतु त्यांनी अजूनही आपले कार्य चालू ठेवले आहे. आणि ते देखील सर्व लोकांना आश्चर्यचकित करते. होय, पपाम्मल आतापर्यंत शेती करीत आहेत. चला मग जाणून घेऊ त्यांची यशोगाथा.
पपाम्मल तामिळनाडूच्या आहेत. विशेष म्हणजे या वयात त्या एकमेव शेतकरी आहेत ज्या सेंद्रिय शेती करतात. त्यांच्याकडे अडीच एकर जमीन आहे. त्या अमिनीमध्ये त्यांनी शेती करणे सुरु केले आहे. यासह त्या तामिळनाडूच्या कृषी विज्ञान केंद्राशी संबंधित आहेत. सेंद्रिय शेतीवर त्यांनी अनेक ऐतिहासिक कामे केली आहेत. त्यांनी शेती करण्यापूर्वी एक दुकान चालविले होते, जे त्यांना पालकांकडून मिळाले होते. यानंतर त्यांनी शेतीसाठी जमीन विकत घेतली.
पपाम्मल आपल्या शेतात डाळी, बाजरी आणि भाजीपाला पिकवत असतात. त्यांना सेंद्रिय शेतीत खूप रस होता, म्हणून त्यांनी बरेच प्रयोग केले. या व्यतिरिक्त त्या राजकीय आणि सामाजिक जीवनात खूप सक्रिय आहेत. त्यांनी अनेक शेतकर्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रेरित केले.
पंतप्रधान मोदींची भेट घेतली
25 फेब्रुवारी रोजी कोयंबतूरमध्ये निवडणूक प्रचारानंतर पंतप्रधान मोदींनी पपाम्मल यांची भेट घेतली. पीएम मोदींनीही त्यांचे चित्र त्यांच्याबरोबर शेअर केले. पीएम मोदींनी लिहिले, ‘आज कोयंबतूरमध्ये आर.आर. पपाम्मल यांना भेटलो’. कृषी व सेंद्रिय शेतीच्या असाधारण कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा