Pik Vima : पीक विम्याचे पैसे बँक खात्यावर हवे असतील तर आजच करा ‘हे’ काम, फक्त 24 तास मुदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pik Vima : शेतकऱ्याच्या पिकाचे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि आणि रोगामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण होते. कधी कधी तर हाता तोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावून घेतला जातो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सरकारने सुरू केली आहे. तुम्हाला पीक विम्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा व्हावेत असे वाटत असेल तर आजच एक गोष्ट करणे खूप गरजेचेच आहे. (Crop Insurence)

सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना बनवत असते. मात्र बऱ्याचदा वेळेवर आपल्याला योजनांची माहिती मिळत नाही. तसेच कधी कधी सदर योजनेला अर्ज कसा करायचा हे आपल्याला समजत नाही. मात्र आता तुम्हाला सरकारी अनुदान मिळवणे सोपे बनले आहे. तुम्ही यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप वापरू शकता. पीक विम्यासारख्या अनेक शासकीय योजनांना अर्ज करण्यासाठी हे अँप शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहे.

फक्त 24 तास बाकी

पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना फक्त एक रुपयांमध्ये पिक विमा काढता येतो. पीक विमा काढण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती. मात्र अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विम्याचा अर्ज केला नव्हता. त्याचाच विचार करून सरकारने याची तारीख वाढवली आहे. आता शेतकऱ्यांना ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या वेळेत सर्व शेतकऱ्यांनी पीक विम्याचे अर्ज करावेत असे आवाहन सरकारने केले आहे. तेव्हा लगेचच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा आणि सरकारी योजनांचे लाभार्थी बना. (Pik Vima)

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

बऱ्याच ठिकाणी उशिरा पाऊस झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील उशिरा झाल्या आहेत. यामुळे पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार नसल्याने यासाठी पंधरा दिवसांची मुदत वाढ मिळावी असे अशी मागणी शेतकरी करत होते. मात्र आता यामध्ये तीन दिवसाची मुदतवाढ मिळाली असून ३ ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा साठी अर्ज करावे लागणार आहेत. याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे

पहा धनंजय मुंडे यांचे ट्विट

या खरीप हंगामात शेतकरी बांधवांनी एक रुपयात पीक विमा भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असून आतापर्यंत दीड कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये, यासाठी ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी 3 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. उर्वरित शेतकरी बांधवांनी आपला विमा अर्ज 3 ऑगस्टच्या आत ऑनलाइन भरून घ्यावा.

error: Content is protected !!