Sugar Production : राज्यात आतापर्यंत 109 लाख टन साखर उत्पादित; 185 कारखाने बंद!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात साखर उत्पादनासाठी (Sugar Production) यंदाचा गाळप हंगाम तुलनेने उत्तम राहिला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात हंगामाच्या सुरुवातीला साखर निर्मितीची प्रक्रिया काहीशी संथ सुरु होती. मात्र, अखेरच्या दोन महिन्यात राज्याने साखर निर्मितीत समाधानकारक कामगिरी केली आहे. राज्यात आतापर्यंत अर्थात 11 एप्रिल 2024 पर्यंत सर्व कारखान्यांनी एकूण 1 हजार 63 लाख मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे एकूण 1 हजार 89 लाख क्विंटल (108.9 लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे. जे मागील वर्षीच्या संपूर्ण हंगामात नोंदवल्या गेलेल्या 105 लाख टन साखर उत्पादनापेक्षा (Sugar Production) अधिक आहे. असे साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

केवळ 22 कारखाने सुरु (Sugar Production In Maharashtra)

हंगामाच्या सुरुवातीपासून राज्यात यंदा एकूण 207 साखर कारखान्यांनी (Sugar Production) आपले गाळप सुरु केले होते. यात प्रामुख्याने 103 साखर कारखाने सहकारी तर 104 साखर कारखाने खासगी आहेत. त्यात सध्याच्या घडीला राज्यात केवळ 22 साखर कारखाने सुरु आहेत. तर 185 साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. दरम्यान, उर्वरित 22 कारख्यान्यांचे गाळप देखील शेवटच्या टप्प्यात असून, हे कारखाने देखील लवकरच आपले गाळप थांबवतील, असे सांगितले जात आहे.

10.25 टक्के साखर उतारा

अर्थात राज्यात बंद झालेल्या कारखान्यांची संख्या ही जवळपास 90 टक्क्यांच्या आसपास आहे. ज्यामुळे सध्या ऊसतोड कामगारांनी देखील घरची वाट धरली आहे. तर ज्या भागात आणखी थोडा फार ऊस शिल्लक आहे. अशा भागांमध्ये देखील कामगारांची घरी जाण्यासाठी लगबग सुरु असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यंदा तुलनेने पाऊस कमी असला तरी साखरेचा उतारा हा चांगला मिळाला आहे. संपूर्ण राज्यभरातील गाळपाचा उतारा हा 10.25 टक्के इतका राहिला आहे.

पुणे विभागाची उत्पादनात आघाडी

याशिवाय साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, पुणे विभागाने यंदाच्या गाळप हंगामात आतापर्यंत राज्यात आघाडी घेतली असून, सर्वाधिक 234 लाख मेट्रीक टन ऊस गाळप केले आहे. तर त्याद्वारे एकूण 246 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar Production) झाले आहे. तर साखर उताऱ्यामध्ये कोल्हापूर विभागाने बाजी मारत, सर्वाधिक तब्बल 11.58 टक्के इतका साखर उतारा मिळवला आहे. तर सर्वांत कमी उसाचे गाळप हे नागपूर विभागात झाले असून, त्या ठिकाणी एकूण 4 लाख मेट्रीक टन उस गाळप झाला आहे. तर विभागात केवळ 2 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

error: Content is protected !!