शेतकरी मित्रांनो, हमीभाव केंद्रावर तूर विक्रीस नेण्यापूर्वी ‘ही’ प्रक्रिया महत्वाची…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीपातील शेवटचे पीक तूर आता बाजारात दाखल होत आहे. महत्वाचे म्हणजे व्यापाऱ्यांकडून कमी किंमतीने तूर खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. सोमवारपासून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब घडली आहे. तुरीसाठी नाफेड कडून हमीभाव केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. मात्र शेतकरी मित्रांनो या हमीभाव केंद्रावर जाण्यापूर्वी तुम्ही काय केले पाहिजे? कोणती कागदपत्रे जवळ बाळगली पाहिजेत? याची माहिती घेणार आहोत.

विक्री केंद्रावर विक्रीसाठी नोंदणी आवश्यक

नाफेडच्या विक्री केंद्रावर तूर घेऊन जाण्यापूर्वी तुम्हला शेतकऱ्याची नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
सोमवारपासून राज्यातील खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी आवश्यक असणारी प्रक्रिया पार पाडली जात आहे.

आवश्यक कागदत्रे
–7/12 उतारा,
–8 अ,उतारा
–पिकपेरा
–बॅंकेचे पासबुकची झेरॅाक्स

वरील कागदपत्रे खरेदी केंद्रावर जमा करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व माहिती ही नाफेडकडे राहणार आहे. त्यामुळे शेतीमालाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे सहज शक्य होणार आहे. तर पिकपेरा असल्याने शेतकऱ्याने किती क्षेत्रावर तूरीचे पीक घेतले आहे याची माहिती संबंधित विभागाकडे राहणार असल्याने अनियमितता होणार नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!