अंगावर वीज पडून दोन शेतकरी जखमी तर एकाचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन दिवसांपासून राज्यातल्या विविध भागात विजांसह पाऊस पडतो आहे. दरम्यान औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अंगावर वीज पडल्यामुळे दोघे शेतकरी जखमी झाले असून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की. ही घटना औरंगाबाद येथील कन्नड तालुक्यातील नादरपूर शिवारात घडली आहे. नादरपूर शिवारातील गट न. 447 मध्ये गुरं चारून परतताना नामदेव शेनफडू निकम यांच्या अंगावर वीज पडली. त्यामुळे त्यांचे जागीच मृत्यू झाला. सोबतच त्यांच्या बाजूला असलेले प्रकाश निकम आणि दिपक निकम यांच्या अंगावर देखील विज कोसळल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर पिशोर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. नामदेव निकम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे.

दरम्यान एकाच गावातील तिघांच्या अंगावर वीज पडल्याने नादरपूरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच तिघांपैकी नामदेव शेनफडू निकम यांचे मृत्यू झाल्याने गावात शोकाकुल वातावरण पाहायला मिळत आहे. नामदेव यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या निधनाने निकम कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

 

error: Content is protected !!