Unseasonal Rain : अवकाळी पावसाने 99 हजार 381 हेक्टर क्षेत्राचे नुकसान – मुख्यमंत्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार (Unseasonal Rain) राज्यातील अंदाजित 99 हजार 381 हेक्टर क्षेत्रावरील पिके खराब झाली आहेत. त्या दृष्टीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच 33 टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ सरकारकडे पाठविण्याची व्यवस्था करावी, असे निर्देशही जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांत 26 नोव्हेंबर रोजी अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामुळे शेती आणि फळपिकांच्या बाधित क्षेत्राबाबत प्राथमिक अंदाजित आकडेवारी सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांनी सरकारकडे सादर केली आहे. राज्य सरकारला प्राप्त झालेली जिल्हानिहाय नुकसानीची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. नुकसान झालेले क्षेत्र हे प्राथमिक अंदाजानुसार आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

ठाणे जिल्ह्यातील नुकसान (Unseasonal Rain In Maharashtra)

  • बाधित तालुके – शहापूर, मुरबाड.
  • 53 हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाल्याचे नुकसान.

पालघर जिल्ह्यातील नुकसान

  • बाधित तालुके – पालघर, वसई, डहाणू.
  • 41 हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाल्याचे नुकसान.

नाशिक जिल्ह्यातील नुकसान

  • बाधित तालुके – कळवण, नांदगाव, नाशिक, निफाड, त्र्यंबकेश्वर, सटाणा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर, चांदवड, येवला.
  • 32 हजार 833 हेक्टर क्षेत्रावरील कांदा, द्राक्ष, सोयाबीन, मका, गहू, ऊस व फळपिकांचे नुकसान.

धुळे जिल्ह्यातील नुकसान

  • बाधित तालुके – साक्री, शिरपूर, शिंदखेडा.
  • 46 हेक्टर क्षेत्रावरील केळी, पपई, कापूस, हरभरा पिकांचे नुकसान.

नंदुरबार जिल्ह्यातील नुकसान

  • बाधित तालुके – नवापूर, अक्कलकुवा, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्राणी.
  • 2 हजार 239 हेक्टर क्षेत्रावरील भात, कापूस, तूर, मिरची, मका, कांदा पिकांचे नुकसान.

जळगाव जिल्ह्यातील नुकसान

  • बाधित तालुके – जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, धरणगाव, बोदवड, भडगाव.
  • 552 हेक्टर क्षेत्रावरील कांदा, हरभरा, गहू, मका, ज्वारी व फळपिकांचे नुकसान.

अहमदनगर जिल्ह्यातील नुकसान

  • बाधित तालुके – संगमनेर, अकोले, कोपरगाव, पारनेर, राहाता.
  • 15 हजार 307 हेक्टर क्षेत्रावरील केळी, पपई, मका पिकांचे नुकसान.

पुणे जिल्ह्यातील नुकसान

  • बाधित तालुके – खेड, आंबेगाव, शिरुर.
  • 3 हजार 500 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, कांदा पिकांचे नुकसान.

सातारा जिल्ह्यातील नुकसान

  • जावळी तालुक्यातील 15 हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाचे नुकसान

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नुकसान

  • बाधित तालुके – पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री.
  • 4 हजार 200 हेक्टर क्षेत्रावरील केळी, पपई व मका पिकांचे नुकसान.

जालना जिल्ह्यातील नुकसान

  • बाधित तालुके – बदनापूर, जालना, जाफराबाद.
  • 5 हजार 279 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, केळी, कांदा, खरीप ज्वारी, गहू व हरभरा पिकांचे नुकसान

बीड जिल्ह्यातील नुकसान

  • बाधित तालुके – परळी, बीड.
  • 215 हेक्टर क्षेत्रावरील कांदा, ज्वारी, भाजीपाल्याचे नुकसान.

हिंगोली जिल्ह्यातील नुकसान

  • वसमत तालुक्यातील 100 हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाल्याचे नुकसान

परभणी जिल्ह्यातील नुकसान

  • बाधित तालुके – परभणी, गंगाखेड, जिंतूर, पाथरी, पूर्णा, पालम, मानवत, सोनपेठ, सेलू.
  • 1 हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी ज्वारी, कापूस, सीताफळ, पेरू, भाजीपाला या पिकांचे नुकसान

नांदेड जिल्ह्यातील नुकसान

  • बाधित तालुके – नांदेड, मुदखेड.
  • 50 हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचे नुकसान.

बुलढाणा जिल्ह्यातील नुकसान

  • बाधित तालुके – बुलडाणा, नांदुरा, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, संग्रामपूर, मेहकर, जळगाव जामोद, मलकापूर, खामगाव, शेगाव, मोताळा, नांदुरा.
  • 33 हजार 951 हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला पिकांचे नुकसान.
error: Content is protected !!