Varas Nond : जमिनीच्या वारस नोंदणीसाठी असा करा ऑनलाईन अर्ज; लागतात ‘ही’ कागदपत्रे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हल्ली ग्रामीण भागात वडिलोपार्जित जमीन नावावर (Varas Nond) करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मूळ मालकाच्या मृत्यूनंतर, अशा व्यक्तीच्या वारसांना जमीन नावावर कशी करावी? याबाबत माहिती नसल्याने त्यांना तलाठी आणि तहसील कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागतात. मात्र वारस नोंद करण्याची संपूर्ण प्रकिया तुम्ही घरबसल्या देखील करू शकतात. जमिनीच्या वारस नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? हा अर्ज तुम्हाला कसा उपलब्ध होईल? वारस नोंद (Varas Nond) करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते? याबाबतची संपूर्ण प्रक्रिया आज आपण पाहणार आहोत.

वारस नोंदणीसाठी प्रक्रिया (Varas Nond Apply Online For Registration)

  • मूळ मालकाच्या मृत्यूनंतर तीन महिन्याच्या आत वारस नोंदणीसाठी (Varas Nond) अर्ज करणे अपेक्षित असते.
  • अर्ज करताना मूळ मालकाच्या मृत्यूची तारीख? त्याच्या नावावर विविध गटांमध्ये एकूण किती जमीन आहे? त्याचे एकूण किती जण वारस आहेत? ही माहिती अर्जात नमूद करावी लागते.
  • अर्जासोबत जमिनीच्या मूळ मालकाचा मृत्यूचा दाखला, त्याच्या नावावरील जमिनीचे ‘8 अ’चे उतारे, सर्व वारसांचे पत्ते, वारसांचे मयत व्यक्तीबरोबर असलेले नाते व शपथेवरील प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते.
  • हा अर्ज मयत व्यक्तीचा जो धर्म असेल, त्या कायद्यानुसार नोंद केला जातो. हिंदू व्यक्तीबाबत हिंदू तर मुस्लिम व्यक्तीबाबत मुस्लिम वारस कायद्याचे नियम प्रमाण मानले जातात.
  • वारस नोंदणीसाठी तुम्ही केलेला अर्ज, तलाठ्याकडील रजिस्टरमध्ये दाखल केला जातो. गावचे सरपंच, पोलीस पाटील यांना विचारणा करून अर्जात दिलेल्या माहितीची सत्यता पडताळून पाहिली जाते. त्यानंतर रजिस्टरमध्ये वारस नोंद ठराव मंजूर करत, फेरफार रजिस्टरमध्ये नोंद घेतली जाते. याबाबत सर्व वारसांना नोटीस प्राप्त होते.
  • 15 दिवसांत या फेरफार नोंदबाबत कायदेशीररीत्या आदेश काढला जातो. त्यानंतर वारसांची नोंद होते.

वारस प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे

  • मूळ जमीन मालकाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र.
  • तलाठी / मंडल अधिकारी यांचा अहवाल.
  • मृत व्यक्ती शासकीय नोकरीस असल्यास त्याबाबत पुरावा. (उदा. सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा उतारा)
  • मृत व्यक्ती पेन्शनधारक असल्यास कोणत्या महिन्यापर्यंत शेवटची पेन्शन घेतली आहे, त्या पानाची प्रत सादर करावी लागते.
  • मृत व्यक्तीच्या रेशन कार्ड झेरॉक्स कॉपी.
  • ग्रामपंचायत/नगरपालिका यांचा जन्म-मृत्यूचा नोंद वहीतील उतारा.
  • सेवा पुस्तिकेत विहित नमुन्यातील वारसाचे नाव लिहिलेला असल्याचा पुरावा.
  • वारस हक्क प्रमाणपत्र व नॉमिनी (वारस हक्क व नॉमिनी हे दोन्ही वेगळे असतात)
  • बॅंक, विमा रक्कम आदींबाबत नॉमिनी म्हणजे मृत्यूनंतर संबंधित खातेदाराची रक्कम ज्या व्यक्तीकडे देण्यात यावी, असे नमूद असलेले नाव त्यालाच ती मिळते.
  • विमा पॉलिसी धारकाने आत्महत्या केल्यास विमा क्‍लेम रक्कम ही नॉमिनी असलेल्या व्यक्तीला मिळत नाही.
  • वारस हक्क प्रमाणपत्र व्यक्तीच्या व संबंधित व्यक्तीच्या संपत्तीवर वारस नोंद, वहिवाट आदी बाबींसाठी महत्त्वाचे असते.

असा करा ऑनलाईन अर्ज

  • सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असे सर्च करुन Hello Krushi App डाऊनलोड करा.
  • हे Hello Krushi App तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर, या अँपमध्ये होम पेजवर तुम्हाला ‘सरकारी योजना’ नावाचा विभाग दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हांला सरकारच्या विविध योजना दिसतील. त्यातील ‘वारस नोंद अर्ज’ यावर क्लिक करा.
  • या ठिकाणी तुम्हाला वारस नोंद (Varas Nond) करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया त्याबाबतची माहिती दिसेल. तसेच शेवटी Apply Now असे बटन दिसेल.
  • ऑनलाईन वारस नोंद करण्यासाठी ‘Apply Now’ बटनावर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘Proceed to login’ या पर्यायावर क्‍लिक करा. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे खाते तयार करावे लागेल. त्यासाठी “Create new user’ यावर क्‍लिक करा. “New User Sign Up’ नावाचे नवीन पेज उघडेल.
  • त्या पेजवर तुम्हाला तुमचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव टाकावे लागेल. त्यानंतर लॉग-इन डिटेल्समध्ये User name टाकून check availability या पर्यायावर क्‍लिक करा. त्या ठिकाणी दोनवेळा तुमचा पासवर्ड टाका. या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्नाचे उत्तर विचारले जाईल, त्याला उत्तर द्या.
  • ही माहिती भरल्यानंतर मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, पॅन कार्ड नंबर आणि पिन कोड टाका. देश, राज्य आणि जिल्ह्याचे नाव त्या ठिकाणी आपोआप येईल. तुम्हाला केवळ Select City ऑप्शनमध्ये तुमच्या गावाचे नाव निवडावे लागेल.
  • तुमचा पत्ता टाकताना त्यात घर क्रमांक आणि गल्लीचे नाव किंवा घरावर काही नाव असेल तर ते टाका.
  • सर्वात शेवटी कॅप्चा टाकायचा आहे आणि मग सेव्ह बटनावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल. (यात “Registration Successful. Please Remember Username & Password for Future Transaction’ असे लाल अक्षरातला लिहिलेले असेल. त्यामुळे तुम्ही तुमचे लॉग इन डिटेल्स कुठेतरी कायमस्वरूपी लिहून ठेवा.)
  • आता नोंदणी करताना टाकलेले युजर नेम आणि पासवर्ड टाका, कॅप्चा भरा, आणि लॉग-इन करा.
  • त्यानंतर तुमच्या समोर ‘डिटेल्स’ नावाचे पेज ओपन होईल.
  • त्या ठिकाणी तुम्हाला ‘7/12 mutations’ वर क्‍लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला वापरकर्ता प्रकार निवडावा लागेल. सामान्य नागरिक असाल तर “User is Citizen’ आणि बॅंकेचे कर्मचारी असाल तर “User is Bank’ या पर्यायावर क्‍लिक करा.
  • वापरकर्ता प्रकार निवडला की त्यानंतर “Process’ या पर्यायावर क्‍लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर ‘फेरफार अर्ज प्रणाली- ई-हक्क’ नावाचे पेज ओपन होईल.
  • त्या ठिकाणी सुरवातीला गावाची माहिती, त्यानंतर जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे.
  • या ठिकाणी तुम्हाला ‘वारस नोंद’ हा फेरफार प्रकार निवडायचा आहे.
  • त्यानंतर तुमच्या समोर वारस फेरफार अर्ज ओपन होईल.
  • त्यात तुम्हाला अर्जदाराची माहिती, यात अर्जदाराचे नाव, वडील किंवा पतीचे नाव आणि आडनाव, अर्जदाराचा ई-मेल आणि मोबाईल नंबर टाकून “पुढे जा’ या पर्यायावर क्‍लिक करायचे आहे.
  • तुम्हाला ‘आपला अर्ज मसुदा जतन केला आहे’ असा मेसेज येईल. त्याबरोबर अर्ज क्रमांक दिलेला असेल. या मेसेजखालील “ओके’ बटणावर क्‍लिक करा.
  • त्या ठिकाणी तुम्हाला मृत व्यक्तीचे नाव किंवा खाते क्रमांक टाकायचा आहे. सातबाऱ्यावरील खाते क्रमांक इथे टाका.
  • त्यानंतर ‘खातेदार शोधा’ या पर्यायावर क्लिक करा.
  • तुम्हाला आता तुमच्या मृत व्यक्तीचे नाव निवडायचे आहे.
  • संबंधित खातेदाराच्या नावे असलेले गट क्रमांक निवडायचे आहे. नंतर त्यांच्या मृत्यूची तारीख टाकायची आहे.
  • पुढे ‘समाविष्ट करा’ या पर्यायावर क्लिक करा.
  • तुम्हाला मयत खातेधारकाच्या जमिनीची सविस्तर माहिती त्या ठिकाणी पाहायला मिळेल.
  • त्यानंतर अर्जदार म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीच्या वारसांपैकी आहात का? असा प्रश्न विचारण्यात येईल. तुम्ही वारसांपैकी असाल तर होय, नसाल तर नाही या पर्यायावर क्‍लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही ‘मयत व्यक्तीच्या सर्व वारसांची नावे भरा’ यावर किल्क करून, तुम्हाला वारस म्हणून जी नावे लावायची आहेत, त्यांची माहिती भरा.
  • यात सर्व वारसांचे नाव हे, त्यांचे नाव, त्यांच्या वडिलांचे नाव किंवा मग पतीचे नाव, आडनाव अशा पद्धतीने लिहायचे आहे. पुढे धर्म निवडायचा आहे. तुमच्या धर्मानुसार वारस कायद्याचे नियम पाळले जातात.
  • त्यानंतर वारसांची जन्मतारीख टाकायची आहे. वय आपोआप त्या ठिकाणी येईल. मोबाईल नंबर आणि पिनकोड टाका. पिनकोड टाकला की राज्य आणि जिल्ह्याचे नाव त्या ठिकाणी आपोआप येईल.
  • पुढे पोस्ट ऑफिस निवडायचे आहे. त्यानंतर तालुका, गाव, घर क्रमांक आणि गल्लीचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर मयत व्यक्तीसोबत वारसांचे असलेले नाते नमूद करायचे आहे.
  • मुलगा, मुलगी, विधवा पत्नी, नातू, नात, सून असे जे नाते असेल ते निवडायचे आहे. यापैकी नाते नसल्यास सगळ्यात शेवटच्या “यापैकी नाही’ या पर्यायावर क्‍लिक करायचे आहे. आणि मग वर्ग-1, वर्ग-2, वर्ग-3 आणि वर्ग-4 मध्ये दिलेल्या नात्यांपैकी एक नाते तुम्ही निवडू शकता.
  • त्यानंतर खालच्या रकान्यात तुम्हाला आता वारसासंदर्भात भरलेली माहिती दिसून येईल. त्यानंतर दुसऱ्या वारसाचे नाव नोंदवायचे (Varas Nond) असेल तर त्या ठिकाणी असलेल्या पुढील वारस या पर्यायावर क्‍लिक करायचे आणि आता जशी माहिती भरली तशीच माहिती त्या वारसासंदर्भात भरायची आहे आणि “जतन करा’ या पर्यायावर क्‍लिक करायचे आहे.
  • अशा रीतीने सर्व वारसांची नावे भरून झाली की “पुढे जा’ या पर्यायावर क्‍लिक करायचे आहे आणि कागदपत्रे जोडायची आहेत.
  • यात तुम्हाला मृत्यू दाखल्याची सत्यप्रत अपलोड करायची आहे. ही प्रत ग्रामपंचायत कार्यालयात मिळते. इतर कागदपत्रांमध्ये कुटुंबातील सदस्यांची माहिती देण्याच्या हेतूने रेशन कार्ड जोडू शकता. मृत व्यक्तीच्या नावावरील जमिनीचे “8 अ’चे उतारेही तुम्ही जोडू शकता.
  • तसेच एका कागदावर एक शपथपत्र लिहून ते इथे जोडणे अपेक्षित असते. यात मृत व्यक्तीच्या सगळ्या वारसांची नावे, त्यांचा पत्ता नमूद करणे गरजेचे असते.
    कागदपत्रे जोडल्यानंतर त्या ठिकाणी फाईल अपलोड झाली असा मेसेज येतो.
  • त्यानंतर तुम्हाला तिथे एक स्वयंघोषणापत्र दिसेल.
  • सगळ्यात शेवटी या पत्राच्या खाली सहमत आहे किंवा Agree या पर्यायावर क्‍लिक करा. त्यानंतर वारस नोंदीसाठीचा तुमचा अर्ज गावातल्या तलाठी कार्यालयात जमा करा.
  • त्यानंतर तलाठ्यामार्फत तुमच्या अर्जाची छाननी केली जाते आणि पुढील प्रक्रिया करून सात-बारा उताऱ्यावर वारसांची नावे नोंदवली जातात.
error: Content is protected !!