डाळींबाचे पाणी व्यवस्थापन कसे करावे? जाणुन घ्या खास Tips

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : डाळींबाला उथळ पाणी देऊ नये, त्याला खोलवर ओलावा गरजेचा असतो परंतू ९५% वाफसा व ५% वेळ ओलावा असावा म्हनजेच कमीत कमी वेळेत जास्त पर्क्युलेशन करन्याची व्यवस्था असावी डाळींब पिकात ६ किंवा ८ लिटर / ताशी चे ड्रीपर वापरावे. इनलाईन ड्रीपर ऐवजी ओनलाईन ड्रीपर जास्त उपयुक्त ठरतात.

डाळींब पिकाला हलक्या जमिनित २.५ तास आठवड्यातून दोन किंवा तिन वेळेस व भारी जमिनित २ तास आठवड्यातून.जास्तित जास्त दोन वेळेस पाणी द्यावे. ज्यावेळी आम्ही पाणी कमी करा असे सुचवतो तेव्हा पाण्याचे तास कमी न करता दोन पाळ्यांमधील दिवस वाढवणे अपेक्षीत असते.

पाण्याचे लिटर कमी केल्यास पिकावर ताण निर्माण होऊ शकतो

दिवसांचा अंतराल ( गॅप ) वाढविल्याने झाड संतुलन करन्यास प्रवृत्त होते व अधीक कणखर बनते.
डाळींब हे दुष्काळी व कोरड्या हवामानातील पिक असल्याने त्याच्यात पाणी धरूण ठेवन्याची क्षमता असते फक्त त्यासाठी जमिनित ह्युमस चे प्रमाण टिकवून ठेवने अत्यंत महत्त्वाचे ठरते , सोबत विविध कडब्यांची ( बाजरी, मका , ज्वारी ) कुट्टी ड्रीपरवर मल्चिंग करून टाकने अत्यंत फायदेशीर ठरत आहे. या वर्षी च्या सर्व कही वापरूनही रोग वाढल्याचे २-३ % बागांमध्ये लक्षात आल्यानंतर तिन प्रमुख कारणे समोर आले …

१. रासायनिक फवारण्यांचा अतिरीक्त व अनावश्यक वापर
२. बेसल डोस पिकाच्या आवश्यकतेपेक्षा कमी भरने
३ . पाण्याचा अति वापर किंवा अती ताण
पाण्याचा अती वापराने म्हनजे रोज किंवा दिवसाआड पाणी देणे , ३-४ तास पाणी देणे , फ्लोचे पाणी सोडने होय
मुळीचे क्षेत्र सतत ओले ठेवने म्हनजे मर , नेमॅटोड , तेल्या , डाग यांना आमंत्रणच होय. पाण्याचे नियोजन करताना आपन पाण्याचा पिएच , टीडीएस व ईसी तपासला तर असे लक्षात येईल की ते पाणी पिकाला जास्त देणे म्हनजे विष दिल्यासारखे आहे.
पाण्याचा पिएच हा साडेसहा ते साडेसात , टीडीएस ३००-४०० असायला हवा परंतू तो यापेक्षा जास्त आढळून आल्याने पिकावर पाण्यातील जास्तीच्या पीएच व टीडीएस चे विषाक्त परिणाम होतात.

“ चला , पाणीच तर आहे , कितीही दिले तर त्याला काय होतेय “ असे म्हनून चालनार नाही.मित्रहो ,

आपन क्षापरट पाणी पिकांना देत आहोत , आजकाल आपन घरात आरओ चे मशीन मधून फिल्टर करून पाणी घेतोय कारण ते थेट पिण्यायोग्य राहीलेले नाहीये मग ते पिकांना तसेच सुरक्षीत कसे असू शकते
४/५ वर्षांपुर्वी मातीत ओरगॅनिक कार्बन होता जो पाणी फिल्टर करून पिकाला उपलब्ध करून देत होता , आज कार्बन नसल्यात जमा आहे त्यामुळे ते क्षारयुक्त जसेच्या तसे पिकात उचलले जाते व पिकावर दुष्परिणाम करतेय.

आपन जर वाटर सोल्यूबल खते सोडत असाल तर आपल्या ड्रीपरजवळ पांढरे थर तयार होतात ज्यामुळे ड्रीपर चा डिस्चार्ज कमी होतो किंवा ते बंदही पडतात.

शरद केशवराव बोंडे

Leave a Comment

error: Content is protected !!