Weather Update : राज्यात अवकाळी पाऊस अन् गारपीट सुरूच; ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आता हितून पुढे १० दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने ( Punjabrav Dakh) वर्तवला आहे. तसेच आज (ता.२५) या दिवशी मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या विभागात गारपिटीची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र, कोंकण भागात देखील अवकाळी पाऊस होणार आहे.

पूर्व विदर्भात हळद, कंदा काढणी सुरू आहे. यामुळे आता या विभागातील शेतकऱ्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच पश्चिम विदर्भात देखील हळद, कांदा, गहू काढणी सुरू आहे. त्याचप्रमाणे कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस होणार आहे. यामुळे कोंकण विभागात यंदा आंब्यांचे उत्पादन कमी पहायला मिळते. यामुळे शेतकऱ्यांनी आंबा पिकांचे रक्षण करावे. तसेच हवामान खात्याने देखील राज्यातील काही भागात येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत.

आपल्या गावात किती दिवस पडणार पाऊस

शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या पिकांची अवकाळी पावसापासून काळजी घेता यावी यासाठी हवामान अंदाजाबाबत माहिती असणे गरजेचे आहे. जर हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर सुरुवातीला एक काम करावं लागेल. जर आपण अजूनही Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हे ॲप सर्च करून इंस्टॉल करा. या ॲपद्वारे हवामान अंदाज या पर्यायावर क्लिक करा. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या गावातील, तालुक्यातील हवामानाबाबत माहिती एका क्लिकवर मिळवता येईल.

कोणत्या भागात येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जाणून घ्या

पावसाला पोषक वातावरण असल्याने आज (ता. २५) विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव येथे गारपीट आणि वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि नगर येथे ‘येलो अलर्ट’ आहे.

error: Content is protected !!