हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पावसाने (Weather Update) चांगलेच थैमान घातले आहे. त्यामुळे शेतशिवारात पाणी साठून राहिले आहे तर काढणीला आलेली सोयाबीन, भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आजही राज्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून आज तब्बल २९ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
11 Oct.
Weather alerts in Maharashtra for coming 3 days …
Mostly thunderstorms associated rainfall.
IMD pic.twitter.com/APe3DepAnK— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 11, 2022
हवामान स्थिती
दक्षिण भारतात केरळ आणि परिसरावर चक्राकार (Weather Update) वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून कर्नाटक, मराठवाडा, विदर्भ, नैर्ऋत्य मध्य प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर अंदमान समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. पोषक हवामानामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे.
आज या भागाला यलो अलर्ट
दरम्यान हवामान खात्याकडून आज कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर (Weather Update) मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर तर विदर्भ विभागातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. या जिल्ह्याना यलो अलर्ट देण्यात आला असून या भागात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.