Weather Update : 3 दिवस राज्यातील ‘या’ भागांत जोरदार पावसाची शक्यता; उकाड्यातही वाढ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील वातावरणात विलक्षण बदल (Weather Update) पाहायला मिळत आहे. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण कायम आहे. तर काही भागांमध्ये जीवघेणा उकाडा जाणवत आहे. तर काही भागांमध्ये पाऊस बरसत आहे. अशातच आता राज्यातील दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पाऊस होण्याची (Weather Update) शक्यता आहे. अशी शक्यता भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) व्यक्त करण्यात आली आहे.

‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी (Weather Update Today 16 April 2024)

यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोलापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तर मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, वाशीम, लातूर, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट (Weather Update) देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

विदर्भात वातावरण निवळले

याशिवाय पूर्व विदर्भात सध्या पावसाचे वातावरण काहीसे निवळले असले तरी, मागील काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसानंतर आता त्या ठिकाणी कमाल तापमानात काहीशी वाढ (Weather Update) झाली आहे. अशातच आता 21 एप्रिलनंतर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊ शकते. असेही हवामान विभागाने म्हटले आहे. तर सध्याच्या घडीला ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये भीषण उकडा जाणवत असून, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

कमाल तापमानात वाढ होणार

राज्यात मागील 24 तासांमध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या ठिकाणी उच्चांकी 41 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. अशातच आता पुढील तीन दिवसात राज्यातील कमाल तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या मालेगाव वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये 40 अंशाहून कमी कमाल तापमान पाहायला मिळत आहे. मात्र, पुढील तीन दिवसांत तापमानाचा पारा अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा चाळीशी पार करू शकतो. असा अंदाजही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

error: Content is protected !!