हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या प्रचंड उकाडा जाणवत आहे. याशिवाय उन्हाची प्रचंड ताप (Weather Update) देखील जाणवत आहे. काही भागांमध्ये ढगाळ हवामान तर काही भागांमध्ये पाऊस पडत आहे. काल (ता.२७) रात्रीपासून अमरावती जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. बुलढाणा, शेगाव याठिकाणीही पाऊस झाला. त्याचप्रमाणे सकाळी अकोला जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाऊस झाला. ज्यामुळे सध्या या भागात सध्या काहीसे अल्लाददायक वातावरण तयार झाले आहे. अशातच आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता (Weather Update) आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे.
‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट (Weather Update Today 27 April 2024)
पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट (Weather Update) देण्यात आला आहे. यात प्रामुख्याने आज (ता.27) राज्यात ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ज्यामुळे या भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे. प्रामुख्याने संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासहित अवकाळी पावसाची शक्यता ही 29 एप्रिलपर्यंत कायम असणार आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
कमाल तापमानात वाढ
दरम्यान, राज्यात मागील 24 तासांमध्ये जळगाव या ठिकाणी उच्चांकी 42.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद (Weather Update) झाली आहे. तर जळगाव व्यतिरिक्त सध्या चंद्रपूर 42.6, वाशीम 42.6, जेऊर 42.5, धुळे 42.0, मालेगाव 42, अकोला 42, वर्धा 42 या ठिकाणी देखील तापमानाचा पारा 42 अंशाहून अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय राज्यातील अन्य सर्वच भागांमध्ये कमाल तापमान हे 42 अंशांहुन अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता किमान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून, मुंबईसह कोकण पट्ट्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.