Weather Update : 24 तासांत राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता – आयएमडी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दक्षिण कर्नाटकपासून ते संपूर्ण महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती कायम (Weather Update) आहे. ज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच येत्या 24 तासांमध्ये (ता.28) मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असून, ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यांचा पाऊस होण्याची शक्यता आहे. असे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. यासह विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट (Weather Update) होऊ शकते, असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

उष्णतेच्या लाटेची शक्यता (Weather Update Today 28 April 2024)

हवामान विभागाने राज्यात पावसासोबतच वादळी वारे वाहण्याची शक्यता (Weather Update) वर्तवली आहे. या काळात राज्यातील अनेक भागांमध्ये प्रति तास 30-40 किमी वेगाने वारे वाहू शकतात. आज प्रामुख्याने कोकण किनारपट्टी भागात उष्ण व आर्द्र हवामान राहणार असून, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. तर सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर,वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट असणार आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

कधी निवळणार पावसाचे वातावरण

राज्यात सध्या दिवसासह रात्रीच्या उकाडयात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत पहाटेचे किमान तापमान सरासरीपेक्षा 5 अंशांनी वाढल्याने, येत्या काही दिवसांत रात्रीच्या उकाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर सध्या पडत असलेल्या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळत आहे. तर अवकाळी पाऊस व गारपिटीचे असलेले महाराष्ट्रातील वातावरण 30 एप्रिलपासून निवळण्याची शक्यता आहे, असेही सांगितले जात आहे.

कमाल तापमानात वाढ होणार

दरम्यान, राज्यात पुढील आठवड्यात कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होणार असून, नागरिकांना उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागणार आहे. मागील 24 तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी 43.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कमाल तापमानात वाढ झाल्याने वर्धा, वाशीम, परभणी येथे पारा 42 अंशांहुन अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय काही निवडक ठिकाणी वगळता राज्यात सध्या सर्वत्र 40 अंशांहून अधिक तापमान असल्याचे पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!