Weather Update : 24 तासांत ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता; विदर्भात उकाडा वाढला!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील वातावरणात सध्या कमालीचा बदल पाहायला (Weather Update) मिळत आहे. गेल्या आठवडयात विदर्भात पाऊस पाहायला मिळत होता. याउलट सध्या विदर्भात उकाडा वाढला आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील वातावरणात कमालीचा बदल पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने पुढील 48 तासांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, धाराशीव, लातूर तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता (Weather Update) असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे.

चक्राकार वाऱ्यांची स्थिती (Weather Update Today 29 March 2024)

अरबी समुद्रातून येणारे वारे आणि बंगालच्या उपसागराहून (Weather Update) येणारे वारे यांची समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. हे वारे प्रामुख्याने मध्यप्रदेशचा काही भाग, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या पश्चिम किनारपट्टीवर कार्यरत आहे. ज्यामुळे सध्या पश्चिम-दक्षिण-मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह पावसाचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यात पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. अशी शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

उकाड्यात प्रचंड वाढ

दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये प्रचंड उकाडा (Weather Update) वाढला असून, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअस ते 41 अंश सेल्सिअस दरम्यान असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे एकीकडे ढगाळ वातावरण तर दुसरीकडे प्रचंड उकाडा यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. तर या वातावरणामुळे उन्हाळी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, विदर्भातील उकाडा पाहता भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि नागपूरसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील तुरळ ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

उत्तरेकडे पावसाचे वातावरण कायम

महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील सर्वच भागांमध्ये सध्या उष्णतेची लाट (Weather Update) पाहायला मिळत आहे. देशातील अनेक भागांमध्ये सध्या तापमानाचा पारा चाळीशी पार गेला आहे. महाराष्ट्रातसोबतस सध्या गुजरात, कर्नाटक, राजस्थानमध्ये प्रचंड उकाडा जाणवत आहे. याशिवाय मागील 24 तासांमध्ये जम्मू-कश्मीर, बलुचिस्तान, मुजफ्फराबाद या ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी झाल्याचे वृत्त आहे. तर पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मिर, उत्तराखंड आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचे वातावरण कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

error: Content is protected !!