Weather Update : आजपासून राज्यात पावसाची शक्यता; हवेचा कमी दाब पट्टा सक्रिय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरूच असून, सध्यस्थितीत मोठ्या प्रमाणात उकाडा (Weather Update) जाणवत आहे. अशातच दक्षिण छत्तीसगड ते विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तमिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत, द्वीपकल्पीय भागाच्या मध्यांवर हवेचा कमी दाब पट्टा सक्रिय आहे. ज्यामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे महाराष्ट्रात सध्या पावसाला पोषक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, आजपासून राज्यात मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पाऊस पाहायला (Weather Update) मिळणार आहे. असे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे.

‘या’ राज्यांमध्येही पावसाची शक्यता (Weather Update Today 7 April 2024)

आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील जवळपास 10 जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर याच कालावधीत उत्तर-पूर्व किनारपट्टी भागातील राज्य असलेल्या ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, बिहार, मध्यप्रदेशचा पूर्व भाग, कर्नाटक राज्यांमध्ये देखील जोरदार पाऊस (Weather Update) होण्याची शक्यता आहे. तसेच या राज्यांमध्ये ढगाळ हवामानासह उकाडा कायम राहणार आहे. याशिवाय आज ईशान्येकडील राज्यांमध्ये देखील पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने म्हटले आहे. अर्थात पावसाचे प्रमुख केंद्र हे महाराष्ट्रातील विदर्भापासून-देशातील उत्तर-पूर्व किनारपट्टीवरील राज्य ते ईशान्येकडील राज्यांपर्यंत असणार आहे.

सोलापुरात उच्चांकी तापमान

दरम्यान, मागील 24 तासांमध्ये सोलापूर या ठिकाणी राज्यातील उच्चांकी 43.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर विदर्भ-मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उन्हाची ताप कायम असून, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सध्या 42 अंश सेल्सिअसहुन अधिक तापमान पाहायला मिळत आहे. तर राज्यात सध्या रात्रीच्या किमान तापमानात देखील मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

उकाड्यापासून दिलासा मिळणार

परिणामी, सध्या घामाच्या धारांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. पुढील आठवडाभर ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी होणार आहे. तर काही भागांमध्ये पाऊस झाल्यानंतर हवेत काहीसा गारवा निर्माण होऊन, उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. परिणामी, पुढील चार ते पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता, शेतकऱ्यांनी शेतीची आवश्यक ती कामे आधीच पूर्ण करावीत, असे आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!