Weather Update : मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट (Weather Update) आणखी दोन दिवस कायम असणार आहे. वायव्येकडून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांचा झोत दक्षिणेकडे सरकल्याने, गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीवरून, अरबी समुद्रामार्गे तो महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागांमध्ये आर्द्रतायुक्त वारे घेऊन येत आहे. ज्यामुळे राज्यात काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता कायम आहे. त्यानुसार उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ-मराठवाड्यातील उत्तर भागातील जिल्ह्यांमध्ये आणखी दोन दिवस पाऊस होण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (Weather Update) व्यक्त करण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यांना 2 दिवस ‘यलो अलर्ट’ (Weather Update In Maharashtra)

हवामान विभागाच्या (Weather Update) अंदाजानुसार, 1 मार्च रोजी राज्यातील प्रामुख्याने नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 2 मार्च रोजी धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढील दोन दिवस या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

‘या’ राज्यांमध्येही गारपिटीची शक्यता

तर उत्तरेकडील राज्यांमध्येही पश्चिमी वाऱ्यांचा झोतामुळे पावसाचे वातावरण कायम असून, पुढील दोन दिवस हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब या राज्यांमध्ये भाग बदलत गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. तर 1 मार्च रोजी राजस्थानचा पश्चिम भाग आणि 2 मार्च रोजी हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा उत्तर भाग आणि राजस्थानच्या पूर्व भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

उन्हाचा चटका वाढला

दरम्यान, राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ (Weather Update) सुरूच आहे. मागील 24 तासांमध्ये राज्यातील धुळे या ठिकाणी निच्चांकी 14.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर याउलट कमाल तापमानातही मोठी वाढ झाली असून, सोलापूर या ठिकाणी उच्चांकी 37.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. याशिवाय पुणे, जळगाव, कोल्हापूर, मालेगाव, नाशिक, सांगली, सातारा, रत्नागिरी, चंद्रपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ अशा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मागील 24 तासांमध्ये तापमानाचा पारा 35 अंशांहून अधिक नोंदवला गेला आहे.

error: Content is protected !!