कारखानदारांनी टाकला 4 हजार 581 कोटींचा दरोडा, राजू शेट्टींचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कारखानदारांवर अनेक आरोप केले आहेत. उसात काटामारी करुन कारखानदारांनी 4 हजार 581 कोटी रुपयांचा दरोडा टाकलाय. असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.

त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हंटले आहे की, सक्षम अधिकाऱ्यांकडून ओटीपीघेतल्याशिवाय तलाठ्याला सात बाऱ्यात नोंदी करता येत नाहीत. ऑईल कंपनीने परवानगी दिल्याशिवाय पेट्रोल पंपचालकाला पेर्टोरल मोडमाप करणाऱ्या यंत्राशी छेडछाड करता येत नाही. मग साखर आयुक्तांच्या परवानगीशिवाय कोणत्याही साखर कारखान्याला वजन काट्याशी छेडछाड करता येणार नाही, असा आदेश का निघत नाही? असा सवालही राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

राज्यातील साखर कारखाने हे सरासरी वजनाच्या 10 टक्के काटा मारतात असा आरोप शेट्टींनी केला आहे. गेल्या हंगामात महाराष्ट्रात 13 कोटी 20 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. यामध्ये राज्याची सरासरी रिकव्हरी ही 11.20 आहे. म्हणजेच 14.78 लाख टन एवढ्या साखरेची चोरी झाल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे. ही साखर किरकोळ किराणा दुकान, मिठाईवाले, शितपेय कंपन्यास विना पावतीची विक्री केली जाते. सरकारने निश्चित केलेल्या दराप्रमाणे याची किंमत 4 हजार 581 कोटी रुपये होते. तर यामधून शासनास मिळणाऱ्या GST रुपातील कर हा 229 कोटी रुपये होतो. किरकोळ व्यापाऱ्यांवर धाडी टाकणारं GST चं खातं का गप्प आहे? असा सवालही राजू शेट्टींनी केला आहे. त्यामुळं दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजेत असेही राजू शेट्टी म्हणालेत.

Leave a Comment

error: Content is protected !!