सोयाबीनची पेरणी बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे करा, दुबार पेरणीचे संकट टाळा, कृषी विभागाचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात यंदा मान्सून पाऊस यंदा वेळे आधी दाखल झालेला आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन पेरणीची लगबग सुरु आहे. पुढील आठ दिवसात शंभर टक्के पेरणी पूर्ण होईल, असा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविला गेलाय.

बीबीएफ तंत्रज्ञानावर सोयाबीनची पेरणी

–बीड जिल्ह्यात यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून दाखल झालाय.
–त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी आहे. परंतु असं असताना शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असं आवाहन देखील कृषी विभागाकडून केलं जातंय. —
-अंबाजोगाई तालुक्यात 45 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झालीय. सोयाबीनचे क्षेत्र जास्त असल्याने दुबार पेरणी टाळायची असेल तर बीबीएफ तंत्रज्ञानावर सोयाबीनची पेरणी करण्यात यावी, असं आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.
–शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करून घ्यावी, जेणेकरून फवारणी अधिक वेळ करावी लागणार नाही. त्याबरोबरच तालुक्यात कोणत्याही बी-बियाणं आणि खताचा तुटवडा नसल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी राजाराम बरवे यांनी दिली आहे.
–शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

बीबीएफ तंत्रज्ञान नेमकं काय?

सोयाबीन रुंद वरंबा सरी पद्धतीनं बीबीएफ पद्धतीनं घेण्यात यावं. चार ओळीनंतर एक ओळ रिकामी सोडून बळीराम नांगर हाणायचा. पाऊस कमी पडला तरी बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे पेरणी करण्यात आलेलं पीक तग धरुन राहतं, असं कृषी अधिकारी राजाराम बरवे यांनी दिली. राज्यभरात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर कृषी विभागाने शेतकऱ्यांना एक महत्वाची सूचना केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!