हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे पाटील विदर्भाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी अमरावती जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकर्यांच्या बांधावर भेटी देत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तर आतापर्यंत तब्बल 3 हजार 221 शेतकर्यांनी या संदर्भात तक्रारी नोंदविल्या आहेत. इफ्को टोक्यो नामक कंपनीने पीकविमा बद्दल काहीही नोंदणी केली नसल्याचा संताप व्यक्त करत इफ्को टोक्यो या कंपनीवर ताबडतोब गुन्हे दाखल करण्याचे आदेश भुसे यांनी आज अमरावतीमध्ये दिलेत .
आज अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी केली. ग्रामस्थ तथा माध्यम प्रतिनिधींशीही संवाद साधला.
टाकरखेडा गावकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. सरकार त्यांना सर्व मदत करेल, जे काही नुकसान झाले असतील त्यांचे पंचनामे करून पुनर्वसन करण्यासाठीं pic.twitter.com/GFCpeyxZfp
— Dadaji Bhuse (@dadajibhuse) July 25, 2021
महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती आहे तर काही ठिकाणी सतत 6-7 दिवसांपासून पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या तेव्हा त्यांना इफको टोक्यो कंपनीच्या कारभाराविषयी माहीती समजली असता त्यांनी थेट इफको टोक्यो कंपनीचा कार्यालयावरच धडक घेतली. इफको टोकियोचे कार्यालय हे अतिशय छोटे असून गोडाऊन सारखे त्यांना दिसले. त्याचबरोबर कोणी कर्मचारीसुद्धा इथे नसल्याने ते आणखीच संतापले होते. तेव्हा कंपनीच्या या गलथान कारभाराविषयी ताबडतोब इफ्को टोक्यो या कंपनीवर कारवाई करण्याचे संकेत कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिलेत.