केळी उत्पादक शेतकरी खुश ! केळींच्या दरात वाढ, प्रतिक्विंटल अडीच हजार रुपये दराने विक्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जळगाव नंतर राज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात केळी उत्पादन अधिक होते. त्यातही जिल्ह्यातील कुरुंदा गिरगाव ते डोंगरकडा या गावांमधील शेती पट्ट्यात केळीचे चांगले उत्पादन घेतले जाते. इथल्या केळींना सध्या चांगला दर मिळतो आहे. सध्या इथल्या केळीची अडीच हजार प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे. त्यामुळे इथल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

उत्पादनात घट

मागील दोन वर्षात कोरोना काळात केळीला भाव नाव्हता. त्यामुळे केळीची लागवड कमी झाली आहे. शिवाय काही दिवसापूर्वी गिरगाव कुरुंदा या भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली होती. त्यामुळे या भागातील शेकडो हेक्टर शेत जमिनीवरील केळीचे मळे जमिनदोस्त झाले होते. तेव्हा या भागातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले होते. संपूर्ण केळींच्या बागांना असा फटका बसल्याने यावर्षीचे केळीचे उत्पादन कमी होणार असल्याचा अंदाज आहे. केळींचा दर वाढणार असल्याचाही अंदाज आहे.

मागच्या तीन वर्षात मिळाला नाही इतका दर सध्या केळीला मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हिंगोलीच्या केळींना दिल्ली येथे मोठी मागणी असल्याने तिथे इथल्या केळ्यांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते.

Leave a Comment

error: Content is protected !!