सतर्क राहा …! आज ‘या’ भागात वीज आणि वादळी पावसासह गारपिटीचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा अवकाळीचे संकट समोर येऊन ठाकले आहे. पुढील तीन – चार दिवस राज्यातल्या विविध भागात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. मागील दोन दिवस राज्यातल्या काही भागात गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे. आज दिनांक १० रोजी विदर्भ मराठवाड्यात जोरदार वारे मेघगर्जना आणि विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भात गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पश्‍चिमी चक्रावात आणि अरबी समुद्रावरून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यात बर्फवृष्टी सुरूच आहे. अनेक ठिकाणी बर्फाची चादर पाहायला मिळतीये राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदिगड, दिल्लीसह उत्तर भारतातील राज्यात उद्यापासून थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तरेकडील पश्चिम विक्षोभ, अरबी समुद्रातून येणाऱ्या आद्रता व पुढील चार ते पाच दिवस अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून एकत्र येणारे वारे यांचा प्रभाव महाराष्ट्रावर जाणवणार आहे. त्याचा परिणाम म्हणून 9 ते 13 जानेवारी दरम्यान मध्य भारतात हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्‍यता असून. दिनांक दहा रोजी विदर्भ, मराठवाडा या भागात विजांच्या कडकडाटासह, गडगडाटी वादळ आणि गारा पडण्याची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

या भागाला अलर्ट जारी
10-
आज दिनांक दहा रोजी नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड ,हिंगोली ,आणि परभणी या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे तर चंद्रपूर-गडचिरोली गोंदिया, आणि भंडारा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

11- दिनांक अकरा रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली ,गोंदिया आणि भंडारा या भागासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे

आज ‘या’ भागात पाऊस
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, विदर्भातील नागपूर ,वर्धा ,यवतमाळ या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्‍यता आहे. तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान राज्यात पुन्हा एकदा तापमान घटायला सुरुवात झाली आहे. आज मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात माळीन येथे सर्वात कमी 8.7 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंद करण्यात आले आहे. तर मुंबईत देखील तापमान खाली गेल्याचे कळते आहे. मुंबई तापमान 20 डिग्री सेंटीग्रेड च्या खाली गेले आहे. हे जवळपास 17 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!