भूमिअभिलेख विभागाचा मोठा निर्णय ; यापुढे सातबारा बंद होणार…!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो , शेतीसाठीची सर्वात महत्वाचे कागदपत्र म्हणजे ७/१२ चा उतारा… मात्र आता सात बराचा उतारा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यांमधील ज्या शहरांमध्ये सिटीसर्वे झाले आहेत आणि सातबारा उतारा देखील सुरू आहे अशा शहरांमध्ये सातबारा उतारा बंद करून त्या ठिकाणी केवळ ‘प्रॉपर्टी कार्ड’ सुरू ठेवण्याचा निर्णय भूमिअभिलेख विभागाने घेतला आहे.

म्हणून घेतला निर्णय

अनेक शहरांमध्ये वाढत्या शहरीकरणामुळे शेतजमीन शिल्लक नाही. अनेक शहरातील शेतजमीन जवळपास संपली आहे. त्यामुळे शहरांमधील सातबारा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सातबाराचे रूपांतर प्रॉपर्टी कार्ड मध्ये झालेलं असतानाही कर आणि इतर लाभ घेण्यासाठी सातबारा कायम ठेवला जातो. त्यामुळे फसवणूकी सारखे प्रकार घडतात आणि म्हणूनच सर्व शहरातील सातबारा बंद करण्याचा निर्णय भूमिअभिलेख विभागाने घेतला आहे. सिटीसर्वे झाला पण सातबारा उतारा नाही अशाही काही जमिनी आहेत त्यातून अनेक घोळ होऊन न्यायालयीन खटल्यांची संख्याही वाढते या सर्व प्रकारांना रोखण्याचा हेतूनं शेतीचा वापर होत नसलेल्या जमिनीचा सातबारा कमी करण्याची प्रक्रिया जमाबंदी आणि भूमि अभिलेख विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. सिटी सर्वे सुरू झाला असल्यास सातबारा उतारा हा मालमत्तेचा अभिलेख बंद होणे आवश्यक आहे तरी सुद्धा सातबाराचा उतारा आणि प्रॉपर्टी कार्डचे दोन्ही अभिलेख सुरू आहेत. मात्र आता इथून पुढं शहरी भागामध्ये सातबारा उतारा बंद होऊन प्रॉपर्टी कार्ड सुरू केले जाणार आहेत.

या शहरात प्रायोगीक अंमलबजावणी सुरू

या निर्णयाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असून पुण्यातील हवेली तालुक्या सोबतच सांगली-मिरज आणि नाशिक पासून याचा प्रयोग सुरू केला जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो राज्यभरात सुद्धा राबवण्यात येईल.

Leave a Comment

error: Content is protected !!