शेतकरी मित्रांनो जाणून घ्या ! किटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी, त्यामुळे विषबाधा झाल्यास काय कराल ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शेतकरी अनेकदा आपल्या शेतीमध्ये कीटकनाशके, तणनाशके यांची फवारणी करीत असतात. मात्र हे करीत असताना शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घेणे खाऊप महत्वाचे असते. शेतात किटकनाशके, तणनाशके वापरतांना काय काळजी घ्यावी ? तसेच किटकनाशके, तणनाशके यांच्यामुळे विषबाधा झाल्यास काय करावे याची माहिती आजच्या लेखात करून घेऊया. ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माहितीला अनुसरून देण्यात आली आहे.

शेतात किटकनाशके, तणनाशके वापरतांना घ्यावयाची काळजी

–शेतांत किड, रोग किंवा तणांचे नियंत्रण करण्यासाठी शेतकरी विविध रासायनिक औषधे फवारतात. ही रासायनिक औषधे फवारतांना मुख्यत: ३ प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो.
–रासायनिक औषधांचे अत्यंत बारिक कण हवेबरोबर श्वासोच्छासासोबत शरीरात जातात.
–फवारणी करीत असतांना त्वचेच्या संपर्कामधून तथा डोळ्यांद्वारे शरीरात जातात.
–फवारणी करतांना नकळत तोंडाद्वारे खातांना, बीडी पीतांना शरीरात जाऊ शकतात.

किटकनाशके वापरतांना सर्वसाधारणपणे घ्यावयाची काळजी

–गळके फवारणी यंत्र न वापरता ते दुरुस्त करुन वापरावे.
–किटकनाशके फवारणी यंत्रात भरतांना सांडू नये यासाठी नरसाळ्याचा (चाडीचा) वापर करावा.
–तणनाशके फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा व तो पंप किटकनाशके वापरताना संरक्षक कपडे वापरावेत.
–फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुवुन ठेवावेत.
–झिजलेले, खराब झालेले नोझल्स बदलून घ्यावेत.
–किटकनाशकाला हुंगणे किंवा त्याचा वास घेणे टाळावे.
–फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब दांड्याचा किंवा काठीचा वापर करावा.
–किटकनाशके पोटात जाण्याची शक्यता असल्याने फवारणीचे मिश्रण करतांना अथवा फवारणीच्या वेळी तंबाखु खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे.
–फवारणीचे काम पुर्ण झाल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवुन खाणे-पिणे करावे.
–फवारणीचे वेळी लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणा पासून दुर ठेवावे
–उपाशीपोटी फवारणी न करता फवारणीपुर्वी न्याहारी करावी
–फवारणी करतांना वापरलेली भांडी इ.साहित्य नदी, नाला किंवा विहीरीजवळ धुवु नयेत, तर धुतांना वापरलेले पाणी त्यात विषारी अवशेष असल्याने पडीक जमिनीत टाकावेत अथवा मातीत गाडावे.
–किटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या वापरानंतर नष्ट करुन टाकाव्यात..
–फवारणी करतांना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी तोंड लावुन फुंकु नये अथवा हवा तोंडाने आत ओढु नये यासाठी सोयीस्कर तार, काडी किंवा टाचणी वापरावी.
–किटकनाशके फवारण्याचे काम दर दिवशी आठ तासापेक्षा जास्तवेळ करु नये. हे काम करणा-या प्रत्येक व्यक्तीने ठराविक कालावधीने डॉक्टराकडून स्वत:ला तपासून घ्यावे.
–किटकनाशके अंगावर पडू नये म्हणून वा-यांच्या विरुध्द दिशेने फवारणी करु नये.
–किटकनाशके मारलेल्या क्षेत्रावर गुरांना चरण्यास किमान दोन आठवडे जावू देऊ नये.
–जमिनीवर सांडलेले किटकनाशक हातंनी न पुसता व त्यावर पाणी न टाकता ती माती/चिखल यांच्या साह्याने शोषुन घ्यावेत व जमिनीत गाडुन टाकावीत.
–डब्यावरील मार्गदर्शक चिन्हाकडे काळजीपुर्वक लक्ष द्यावे.
–लाल रंगाचे चिन्ह/खुणा असलेली औषधी विषारी असुन त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो.

विषबाधा झाल्याची लक्षणे व उपाययोजना

विषबाधा ही किटकनाशके/तणनाशके यांचा त्यांचेशी संपर्क अथवा पोटत गेल्यास होते.विषबाधा व इतर आजार यांच्या लक्षणात बरेचदा साम्य राहू शकते.
अशक्तपणा व चक्कर येणे.त्वचेची जळजळ होणे, डाग पडणे, घाम येणे.डोळ्यांची जळजळ होणे, पाणी येणे, अंधुक दिसणेतोडातुन लाळ गळणे, तोंडाची आग होणे, उलटी येणे, मळमळणे, हगवण होणे, पोटात दुखणे.डोकेदुखी, अस्वस्थ होणे, स्नायुदुखी, जिभ लुळी पडणे, बेशुध्द होणे, धाप लागणे, छातीत दुखणे, खोकला येणे.अशी लक्षणे विषबाधा झाल्यास दिसून येऊ शकतात.

विषबाधेनंतर तातडीने करावयाचे प्रथमोपचार

–किटकनाशके/तणनाशके डोळ्यांत उडाल्यास, तात्काळ डोळे स्वच्छ पाण्याने ५ मिनीटापर्यंत पाण्याची धार सोडुन धुवावे.
–शरीरावर उडाले असल्यास १० मिनिटे साबणाने स्वच्छ धुवावे व दवाखान्यात न्यावे.
–विषबाधेनंतर रोगी जर संपुर्ण शुध्दीवर असेल तरच उलटी करण्यास प्रवृत्त करावे अन्यथा नाही व ३ चमचे बारीक लाकडी कोळसा भुकटी करुन अर्धा ग्लास —पाण्यातुन पाजा व लगेच दवाखान्यात न्या.
–विषारी औषध कपड्यांवर उडाले असल्यास ते कपडे लगेच बदला व रोग्यास शक्य तितक्या लवकर दवाखान्यात पोहचवा.
— विषबाधा झाल्यास डॉक्टरांना दाखवणे आणि सल्ल्याने औषधे घेणे महत्वाचे राहील.

Leave a Comment

error: Content is protected !!