हॅलो कृषी ऑनलाइन : शेतकरी मित्रांनो , पश्चिमी चक्रावात आणि अरबी समुद्रावरून होणारा बाष्पांचा पुरवठा यामुळे हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यात बर्फवृष्टी होते आहे. मध्य भारतातील राज्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडतोय. याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. आज दिनांक आठ रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसच पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या बरोबरच उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने काल शुक्रवारी हजेरी लावली.
उद्या गारपीटीची शक्यता
उद्या दिनांक 9 रोजी विदर्भात गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. अमरावती, नागपूर, वर्धा ,चंद्रपूर जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान राज्याच्या अनेक भागात थंडी कमी झाली आहे राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान 18 ते 21 अंशांच्या दरम्यान तर कमाल तापमानात 27 ते 33 अंश या दरम्यान शुक्रवारी दिनांक 6 रोजी विदर्भातील वाशिम इतर राज्यातील नीचांकी 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
‘या’ भागाला यलो अलर्ट
8- औरंगाबाद ,जालना, परभणी ,हिंगोली ,नांदेड
9- यवतमाळ ,गडचिरोली, वर्धा ,नागपूर, अमरावती, अकोला ,परभणी
10- अकोला, यवतमाळ, चंद्रपूर नागपूर, अमरावती, वाशीम, बुलाढाणा
11- नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा ,वर्धा