हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून कोकणासह राज्यातील काही भागात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा प्रभाव आता कमी झाला आहे. येत्या पाच ते सहा दिवसात राज्यात तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून पुढील आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे.
पावसामुळे तापमानात घट
पावसामुळे तापमानात चांगलीच घट झाली आहे. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानात बऱ्यापैकी घट झाली आहे. त्यामुळे उकाडा कमी झालाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात काही प्रमाणात ऊन पडत आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका नाही. सोमवार दिनांक एकवीस सकाळच्या आठ वाजेपर्यंत विदर्भातील ब्रम्हपुरी त 35.8 अंश सेल्सिअस सर्वाधिक कमाल तापमान नोंदले. सध्या बहुतांशी भागात तापमान हे सरासरीएवढे आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. विदर्भातही पारा कमीच आहे. विदर्भात कमाल तापमान 29 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान होते. मराठवाड्यातही 33 अंश सेल्सिअस मध्य महाराष्ट्रात तापमान 20 ते 35 अंश सेल्सिअस तर कोकणात 31 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान होते.
कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाने चांगलीच उसंत दिली आहे तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे नद्यांमधील पाणी पातळी कमी होऊ लागली आहे.वाढलेल्या पाणीपातळी मुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. खानदेश, मराठवाडा विदर्भात दिवसभर उन्हासह काही प्रमाणात ढगाळ वातावरण होतं. दरम्यान बुधवारी आणि गुरुवारी भंडारा नागपूर गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.