हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या शेतकऱ्यांना सध्या पावसाची आस लागली आहे. बहुतांशी भागात सध्या ऊन पडत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे दरम्यान हवामान विभागाने राज्यातल्या काही भागात पावसाच्या माध्यम सरी बरसतील असा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिला आहे.
Nowcast warning issued at 0700 Hrs IST dated 26/08/2021 :
Moderate spells of rain very likely to occur at isolated places in the districts of Beed,Latur,Osmanabad, Pune, Solapur, Ratnagiri and Kolhapur during next 3-4 hours.
-IMD MUMBAI
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 26, 2021
मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा फिरोजपुर, पानिपत, मीरुत, गोरखपुर, पासून हिमालयाच्या पायथ्यापर्यंत सक्रिय आहे. मान्सूनचा आस उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. ईशान्य राजस्थान आणि लगतच्या परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. त्यापासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे. तसेच बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात चक्रीय स्थिती सक्रिय झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर असल्याने पूर्व विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भांत पावसाची शक्यता
दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या नागपूर विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 26 रोजी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.दिनांक 27 रोजी नागपूर वर्धा, भंडारा, गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.दिनांक 28 रोजी देखील विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.दिनांक 29 आणि 30 रोजी मात्र पावसाचा प्रमाण काहीसं कमी होणार असून गोंदिया, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यात 12 ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे
विदर्भ के लिए दिनांक 26.08.2021 के संलग्न मौसम संबंधी पूर्वानुमान और चेतावनी pic.twitter.com/bgd568Mppa
— Regional Meteorological Centre, Nagpur (@imdnagpur) August 26, 2021