राज्यातल्या 10 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ; विदर्भात उष्णतेची लाट कायम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकरी मित्रांनो, यंदाच्या वर्षीचा एप्रिल महिना हा सर्वाधिक उष्ण महिना राहिला. या महिन्यांमध्ये राज्यातील काही भागातील तापमान हे 46 अंशांपर्यंत पोहोचले. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमधील तापमानाने चाळीशी पार केली. दरम्यान आता मे महिन्यात तरी या उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळेल अशी सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची सुद्धा आशा आहेत.

१० जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस

दरम्यान भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिलेल्या माहितीनुसार उद्या दिनांक 3 आणि परवा दिनांक 4 मे रोजी विजांच्या कडकडाटासह व गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस राज्यातल्या काही भागांमध्ये होऊ शकतो. तसंच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. या वाऱ्याचा वेग सुमारे 30 ते 40 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाकडून कळवण्यात आली आहे.

तर दिनांक 3 मे 2022 रोजी पर्यंत विदर्भ मध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. आज दिनांक 2 मे रोजी चंद्रपूर, वर्धा आणि अकोला या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून या भागाला भारतीय हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार
दिनांक ३-४ मे दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट शक्यता आहे तर दिनांक एक ते दोन मे रोजी मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा आणि पश्चिम राजस्थान व उष्णतेच्या लाटेची शक्‍यता आहेत. दिनांक पाच मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे . तर पाच आणि सहा मे रोजी अग्नेय बंगालच्या उपसागरावर आणि दक्षिण अंदमान समुद्र ला लागून असलेल्या भागाला वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्याचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता असून त्यामुळे मच्छीमारांना या भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!