राज्यातून थंडी गायब ; पुण्यात मात्र हुडहुडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात नोव्हेंबर च्या शेवटी आणि डिसेंबर च्या सुरुवातीच्या काळात अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर राज्यातील वातावरणात सतत बदल होताना पाहायला मिळत आहे. अद्यापही राज्यातल्या काही भागात ढगाळ वातावरण आहे. तर काही भागात थंडी तर काही भागात उकाडा अनुभवायला मिळत आहे. पुण्यात थंडी वाढली असून पुढील 3 दिवस धुके वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईत तापमानात वाढ
–मुंबईतील थंडी गायब झाली असून तापमानात वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
–उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह थेट राज्याकडे येत नसल्याने कडाक्याच्या थंडीतील विघ्न कायम आहेत.
–रात्री हवेत काही प्रमाणात गारवा असला, तरी राज्यात सर्वच ठिकाणी किमान तापमान अद्यापही सरासरीच्या पुढेच असल्याने डिसेंबरमध्ये या कालावधीत अपेक्षित असलेली थंडी जाणवत नाही.

राज्यातील थंडी गायब
–पुढील तीन ते चार दिवस तापमानात फार मोठ्या प्रमाणात बदल होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.
–डिसेंबरच्या सुरुवातीपासून थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता असताना अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आणि रात्रीची थंडी गायब झाली.

पुण्यात कमी तापमानाची नोंद
राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद रविवारी पुण्यात झाली. शहरात 14.1 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान तर 28.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झालेली आहे. पुढील तीन दिवस शहरात अंशतः ढगाळ वातावरणाची आणि धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर आज पुण्यातील पाषाण येथे कमीत कमी 13.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

संदर्भ : टीव्ही 9

Leave a Comment

error: Content is protected !!