जाणून घ्या ! पावसाळ्यात जनावरांना होणारे ‘हे’ ५ आजार आणि औषध उपचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या पावसाळा चालू आहे, या दिवसात जनावरांची विशेष काळजी घेतली जाणे फार महत्वाचे आहे. पावसाळ्यात जिवाणू, विषाणूंच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि जनावरे अनेक संसर्गजन्य आजाराला बळी पडतात. हे टाळण्यासाठी या काळात जनावरांची योग्य काळजी घ्यावी. पावसाळ्यामध्ये जनावरांची काळजी कोणत्या प्रकारे घ्यावी. याबाबत आजच्या लेखात माहिती घेऊया

१) पोट फुगणे

लक्षणे
–हिरवा व कोवळा चारा जास्त प्रमाणात खाल्याने जनावरांचे कोटी पोट फुगते.
–कोटी पोट डाव्या बाजूला असल्याने पोटाकडे ची डावी बाजू फुगे सारखे दिसते.
–पोटात तयार होणारा गॅस तोंडावाटे बाहेर न पडता पोटात साठून राहतो अशावेळी जनावर खाली पडून उठू शकत नाही.
–फुगलेल्या पोटाचे वजन हृदयावर व फुफुसावर पडल्याने जनावर दगावण्याची शक्यता असते.

उपाय
–पोटफुगी टाळण्याकरता जनावरांनाहिरव्या चाऱ्याबरोबर दोन ते तीन किलो सुका चारा खायला द्यावा.
–त्यामुळे जनावरांची पचनसंस्था व्यवस्थित कार्यरत होते व पोट फुगी चे समस्या टाळता येते.
–जनावरांना दिवसभर चरायला सोडू नये. कारण जनावर दिवसभर कोवळे गवत खाते.
–पावसाळ्यात पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार पोटफुगीवर औषध आणून ठेवावी जेणेकरून जनावरावर वेळेस उपचार करता येतील.
–पोटफुगी आजारावर प्रथमोपचार म्हणूनअर्धा लिटर गोड तेलात 30 मिलि टर्पेंटाइन, 100 ग्रॅम सोडा व पाच ग्रॅम हिंग मिसळून आजारी जनावरांना ठसका न लागता हळू पाजावे.

२) खुरातील जखमाच गळणे व त्यात किडे पडणे

लक्षणे

–पावसाळ्यात जनावरांचे पाय सतत पाण्यात राहिल्यामुळे तेव्हा त्यात चिखल गेल्यामुळे खुरामध्ये जखमा होतात.
–सतत ओलावा राहिल्यामुळे अशा जखमा चिघळून त्यावर माशा बसतात आणि जखमेत किडे पडतात.
–असे झाल्याने जनावरांच्या पायांना वेदना होतात, जनावर लंगड ते परिणामी जनावरांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते व दूध उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो.

उपाय
–जनावरांचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा. जखम पोटॅशियम परमॅग्नेट ने स्वच्छ करून मलमपट्टी करावी.

३)घटसर्प, फऱ्या, पायलाग

–पावसाळ्यात जनावरांना घटसर्प, फऱ्या, पायलाग यासारखे संसर्गजन्य आजार होतात.
–दमट वातावरणात घटसर्प सारखे श्‍वसनाचे आजार जास्त प्रमाणात दिसून येतात.
–या आजारात जनावरांच्या छातीत पाणी होते, खालचा जबडा खाली सूज येते, श्वासोश्वास करायला त्रास होतो,
–जनावराचा 104 ते 105 अंश फॅरेनहाईट ताप येतो. संसर्ग झालेल्या जनावरांना पैकी 90 टक्के जनावरे मृत्युमुखी पडतात.

उपाय

–पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा उन्हाळ्यात मे-जून महिन्यात जनावरांना या आजारावर प्रतिबंधात्मक लस टोचावी त्याचप्रमाणे फऱ्या, पायलाग, काळ रोग, धनुर्वात या आजारावर लसीकरण करून घ्यावे.

४) गढूळ पाण्यामुळे होणारे आजार-पावसाळ्यात पाणी गढूळ होण्याची शक्यता अधिक असते.गढूळ पाण्यामुळे रोगजंतूंचा प्रादुर्भाव वाढतो.

उपाय – खाद्याच्या गव्हाणी व पाण्याच्या टाक्यांना चुना लावावा. पाणी शुद्ध होण्याकरिता पाण्यात एक टक्का पोटॅशिअम परमॅग्नेट मिसळावे.

५)गोचीड, गो माशांचा प्रादुर्भाव –

–पावसाळ्याच्या सुरुवातीला जनावरांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात गोचीड, गो माशांचा प्रादुर्भाव होतो.
–गोचिडांची लागण जास्त झाल्यास जनावरांच्या लघवी मध्ये रक्त येते व त्यामुळे मूत्राचा रंग कॉफी सारखा दिसतो.
–गोचीड जनावरांच्या त्वचेला चिकटून बसतात त्यामुळे त्वचेला खाज सुटते. जनावर रंग भिंतीवर घासते किंवा पायाने खाजवण्याचे प्रयत्न करते.
–त्यामुळे जनावरांच्या अंगावर जखमा होतात. जखमांवर वेळीच उपचार न केल्यास त्यावर माश्या बसतातआणि त्यामध्ये किडे पडण्याची शक्यता निर्माण होते. –अशा जखमा पूर्णपणे बऱ्या होण्यास बराच वेळ लागतो.
–गोचीड यामुळे जनावरांना विषम ज्वर हा आजार होतो.
–या आजारात जनावर स्वतःभोवती चक्कर घेते, डोके आपटते.हा आजार संकरित जनावरांना जास्त प्रमाणात दिसून येतो. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होते व जनावरांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होतो.

उपाय

जनावरांच्या अंगावर गोठ्यातील गोचीड,गोमाशा प्रतिबंधक औषधांची शिफारसीनुसार फवारणी करावी.गोठ्यातील शेण, मलमूत्राची वेळोवेळी साफसफाई करून गोठा स्वच्छ व कोरडा व हवेशीर ठेवावे. व्यायला आलेल्या जनावरांची काळजी-पावसाळ्यात जनावर व्यायल्यानंतर जनावर आजाराला बळी पडू शकते. याकाळात व्यायल्यानंतर वार न पडणे, मायांग बाहेर येणे, थंडी ताप, दुग्ध ज्वर अशा प्रकारच्या समस्या जनावरांमध्येआढळून येतात. जनावरांमध्ये वरील समस्या आढळल्यास पशुवैद्यकाकडून वेळीच उपचार करून घ्यावे.

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!