हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे. मंगळवारी दिनांक 14 रोजी निफाड येथे नीचांकी 12.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज दिनांक 15 रोजी राज्यात मुख्यतः कोरडे हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
वायव्य आणि उत्तर भारतातील राज्यात गारठा चांगलाच वाढू लागला आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, राजस्थान इतर राज्यात किमान तापमान सहा ते दहा अंशांच्या दरम्यान आहे. मंगळवार दिनांक 14 रोजी हरियाणाच्या हिस्सार इथं देशाच्या सपाट भूभागावरील सर्वात निचांकी 4.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील ही थंड हवा महाराष्ट्राकडे येणार असल्याने तीन दिवसात किमान तापमानात आणखी घट होणार आहे.
१४ डिसेंबर, IMD ने आज दिलेल्या पूर्वानुमाना नुसार उत्तर पश्र्चिम व मध्य भारतातील बहुतांश भागात पुढच्या 2,3 दिवसात तापमानात विषेश बदलाची शक्यता कमी.
नंतर तापमानात हळू हळू घट होण्याची शक्यता, महाराष्ट्रातील उत्तर-मध्य व संलग्न मराठवाडा व विदर्भ सहीत.— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 14, 2021
दरम्यान कोकण वगळता राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान 30 अंश व त्याखाली आले आहे. मंगळवार दिनांक 14 च्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी येथे सर्वाधिक 34. ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात किमान तापमानात हळूहळू घट होत आहे. विदर्भ मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा 15 अंशांच्या जवळपास आला आहे.