‘असानी’ चक्रीवादळाचा प्रभाव…! महाराष्ट्रात कशी असेल हवामानाची स्थिती ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या खाडी मध्ये असानी चक्रीवादळ सक्रिय झाले. ते आता हळूहळू आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रासह इतर राज्यांवरही होत आहे. आज ताज्या नोंदवलेल्या निरीक्षणानुसार असानी चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. मात्र आंध्रप्रदेश किनारपट्टीला या वादळासाठी ‘रेड अलर्ट’ जरी करण्यात आला आहे. पुढच्या काही तासात हे वादळ आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर पोहचण्याची शक्यता आहे. अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात कशी असेल हवामानाची स्थिती ?


दरम्यान महाराष्ट्राचा विचार करता, पुण्यासह काही भागामध्ये उष्णतेची पातळी कमी होण्याची शक्यता असून ‘असनी’ चक्री वादळाच्या प्रभावामुळेराज्यातील कोकणात, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी हलक्या सारी बरसतील . हे वातावरण मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली ,सातारा तसेच कर्नाटका केरळ या भागात असणार आहे. अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस . होसाळीकर यांनी दिली आहे.

दरम्यान इतर राज्यांचा विचार करता पश्चिम बंगाल आणि ओडिसा च्या किनारपट्टी भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे . तर आज दिनांक ११ मे राजी आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पुढच्या काही तासात या भागात असनी चक्रीवादळ येणार आहे त्यामुळे या भागाला अलर्ट देण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!