थंडीचा केळी पिकावर परिणाम ; बागांचेही नुकसान , दर आणि मागणीतही घट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: रब्बी हंगामातील पिकांना थंडी अनुकूल असते. मात्र काही फळपिकांना अति थंडीचा फटका बसतो. असेच काहीसे केळी पिकाच्या बाबतीत होते. केळी पिकाला अतिथंड हवामान प्रतिकूल नसते. सध्याचे अति थंड वातावरण केळीसाठी घातक आहे. त्यामुळे दरावर परिणाम होत असून सरासरी 6 ते 7 रुपये किलो असा दर शेतकऱ्यांना मिळतो. यंदा मात्र, यामध्ये निम्यानेच घट झाली आहे. तसेच वाढत्या थंडीमुळे ग्राहकही केळीकडे पाठ फिरवत आहेत.

हिवाळ्यात केळी बागावर काय होतात परिणाम ?

10 अंश सेल्सिअसच्या कमी तापमानाची नोंद होताच केळीची नैसर्गिक वाढ थांबते.
–पाने पिवळी पडतात आणि गंभीर परिस्थितीत ऊती मारायला लागतात.
–बागा सर्वसामान्य दिसत असल्या तरी अधिकच्या गारव्यामुळे केळीच्या घडाची वाढ खुंटलेली असते.
–केळीच्या घडाचा आकार वाढलेला दिसतो पण आतमधून तो भाग पोखरला जाऊ शकतो. याला घसा खडू असे म्हणतात. त्यामुळे कधीकधी घड परिपक्व होण्यास 5-6 महिने लागतात. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात घडाची वाढ होत नाही.

कशी घ्याल केळी पिकाची काळजी

–बदलत्या वातावरणाचा परिणाम आगामी काळात लागवड केल्या जाणाऱ्या केळीवरही होतो.
–त्यामुळे या थंडीच्या काळात फुल लागवड होऊच नये.
— हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीमुळे किंवा कधीकधी गुच्छ आभासी खोडातून योग्य प्रकारे बाहेर येत नाही म्हणून गुच्छाची वाढ चांगली नाही.
–टिश्यू कल्चरपासून तयार केलेले केळीतील फूल 9 व्या महिन्यात लागतात तर साकरने लावलेल्या केळीतील घड 10 व्या किंवा 11 व्या महिन्यात येतो.

सिंचनाची योग्य पध्दत

–सर्वात महत्वाचे म्हणजे केळीच्या बागेसाठी नियमित पाण्याची आवश्यकता असते.
–पाणी वर्षभर दरमहा किमान १० सेंमी इष्टतम स्वरूपात वितरित करावे लागते.
–केळीच्या शेताची माती हिवाळ्यात नेहमीच ओलसर असणे आवश्यक आहे. त्यामुळे हिवाळा सुरु होण्यापूर्वी केळीच्या बागेत हलक्या प्रकारची मशागत करणे गरजेचे आहे.
–यामध्ये लहान ट्रक्टरच्या सहायाने नांगरण करुन घ्यावी तसेच रोगराईचा प्रादुर्भाव होताच खताची मात्रा देणे गरजेचे आहे.
–त्यामुळे रोगराईचे प्रमाण कमी होणार आहे. इतर हंगामात नाही पण थंडीमध्ये केळीच्या बागांची विशेष काळजी हाच यावरील पर्याय आहे.

थंडीच्या लाटेमुळे गेल्या पंधरा दिवसापासून बाजारात केळीची मागणी घटलीय, त्यामुळे केळी व्यापारी आणि शेतकऱ्यांना त्यांचा फटका बसलाय. सध्या केळीचे व्यापारी हे बांधावर जाऊन हजार रुपये प्रति क्विंटल दराने केळीची खरेदी करत आहेत, काही दिवसांपूर्वी केळीची मागणी असताना हेच दर दीड हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेले होते.

Leave a Comment

error: Content is protected !!