हॅलो कृषी आॅनलाईन | 55 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन लागू करा. अशी मागणी किसान युवा क्रांती संघटनेच्यावतीने यशवंत गोसावी यांनी केली आहे. पाच वर्षे सत्ता भोगणाऱ्या आमदाराला पेंशन मिळते. लष्करात काम करणाऱ्या सैनिकाला पेन्शन मिळते, सरकारी नोकरी केलेल्याला पण पेंशन मिळते. मग जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला का पेंशन मिळत नाही. असा सवाल उपस्थित करत. यशवंत गोसावी यांनी 55 वर्षांवरील शेतकऱ्याला पेन्शन द्या. अशी मागणी केली आहे. पाहुयात ते काय म्हणालेत.