शेतकऱ्यांसाठी खूशखबर!PM KISAN पैसे दुप्पट होणार, 2000 ऐवजी 4000 मिळणार, सरकारची नेमकी योजना काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत  देशात लाखो, करोडो शेतकरी याचा फायदा घेत आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांना आणखी एक आंनदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 2000 रुपयांऐवजी 4000 रुपयांचे हप्ते येऊ शकतात. माध्यमांच्या अहवालांनुसार मोदी सरकार लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांना गिफ्ट देऊ शकते. अहवालानुसार, केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना  ची रक्कम दुप्पट करण्याचा विचार करीत आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना 6000 रुपयांऐवजी दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 12000 रुपये मिळू शकतात.

मीडिया रिपोर्टनुसार, बिहारचे कृषिमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी अलीकडेच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची दिल्लीत भेट घेऊन पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मिळत असलेली रक्कम दुप्पट करण्याबाबत चर्चा केली. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

वर्षाला शेतकऱ्यांना मिळते 6,000 ची रक्कम

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 6,000 रुपये पाठवले जातात. हे पैसे 3 हप्त्यांमध्ये पाठवले जातात. प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये पाठवले जातात. दर 4 महिन्यांनी एक हप्ता येतो. पीएम किसान पोर्टलनुसार, योजनेचा पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्चदरम्यान येतो. दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलैदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतो. तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जातो.

पीएम किसान योजनेत आपले नाव असे पहा

–सर्वप्रथम पंतप्रधान किसान योजना च्या अधिकृत संकेतस्थळावर जा. https://pmkisan.gov.in
–यानंतर तुम्हाला होमपेजवर Farmers Corner पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.
–या कोपऱ्यात Beneficiaries List , लाभार्थी यादीचा पर्याय येईल त्यानंतर त्यावर क्लिक करा.
–आता आपल्याला डॅशबोर्डवर क्लिक करावे लागेल आणि राज्य, जिल्हा, तहसील, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.
–त्यानंतर Get Report गेट रिपोर्टवर क्लिक करा.
–आता गावातील लाभार्थ्यांची संपूर्ण यादी तुमच्या समोर येईल. यामध्ये आपण हे पाहू शकता की योजनेचे पैसे कोणाला मिळवू शकतात

या योजनेचा लाभ कुणाला मिळत नाही ?

–पीएम किसान सन्मान योजनेत सरकारी कर्मचारी किंवा प्राप्तिकर भरणारे शेतकरी पात्र मानले जात नाहीत.
–याशिवाय दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे डॉक्टर, अभियंता, सीए आणि कर्मचारीही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
–खासदार आणि आमदारांनाही पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळत नाही.
–आतापर्यंत देशातील 11.82 कोटी शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
–केंद्र सरकारने असे म्हटले आहे की वार्षिक 6 हजार रुपये त्याच शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग केले जातील, ज्याच्या नावावर शेती असेल..

Leave a Comment

error: Content is protected !!