हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी राजा ज्या मान्सूनची आतुरतेनं वाट पाहत होता ती वेळ अखेर आली आणि मान्सून राज्यामध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. शेतकऱ्यांची सध्या खरिपाच्या हंगामासाठी लगबग सुरू आहे. तीन जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. आता मान्सूनने राज्यातही हजेरी लावली आहे त्यामुळे. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यात शेतीच्या कामाला वेग आला आहे.
चांगली बातमी मान्सूनची ..🌧🌧🌧
मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला.
मान्सून रेषा राज्यात, द.कोकणात हर्णे पर्यंत, द.मध्य महाराष्ट्रात सोलापूर पर्यंत, मराठवाडा काही सलग्न भाग…
परीस्थिती पुढच्या वाटचालीसाठी अनुकुल..
IMD pic.twitter.com/L4ZmSbFlrb— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 5, 2021
मुंबई हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला.मान्सून रेषा राज्यात, द.कोकणात हर्णे पर्यंत आहे. तसेच द.मध्य महाराष्ट्रात सोलापूर , मराठवाडा आणि काही सलग्न भागात मान्सूनच्या जोरदार सारी बरसतील. तसेच मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठीदेखील अनुकुल वातावरण आहे अशी माहिती मुंबई हवामान विभागाने दिली आहे.
तसेच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मान्सूनची वाटचाल पुढे मध्य अरबी समुद्राच्या अधिक भागात, संपूर्ण तटीय कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रातील काही भाग, उत्तर अंतर्गत कर्नाटकातील बहुतेक भाग, तेलंगणा व आंध्र प्रदेशचा काही भाग व्यापणारी आहे.
Southwest Monsoon has further advanced into more parts of Central Arabian Sea, entire Coastal Karnataka, Goa, some parts of Maharashtra, most parts of North Interior Karnataka, some parts of Telangana and Andhra Pradesh,
— India Meteorological Department (@Indiametdept) June 5, 2021
यंदा मान्सून जोरदार बरसणार
भारतीय हवामान खात्याने यंदा मान्सून जोरदार बरसणार असल्याची माहिती दिली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये देशभरात सरासरी 101 टक्के पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या नवीन सुधारित अंदाजानुसार यंदा कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरी पावसा पेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.