हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाळा तोंडावर आल्यामुळे आता देशातील शेतकऱ्यांना खरीपाच्या लागवडीचे वेध लागले आहेत. यंदा मान्सून देखील वेळेत येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आता पावसाळी पिके घेण्यासाठी लगबग सुरु आहे. खतांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. मात्र केंद्र सरकारने DAP खतांवरील सबसिडी 500 वरून 1200 रुपयांपर्यंत वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार क्रेंद्र सरकार दर वर्षी रासायनिक खतांच्या सबसिडीवर जवळपास 80,000 कोटी रुपये खर्च करते. यावर्षी DAP सबसिडी वाढवण्यासोबतच खरिपासाठी भारत सरकार 14,775 अतिरिक्त खर्च करणार आहे. अशी माहिती तोमर यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना DAP खताची गोणी 2411 ऐवजी 1200 रुपयांना मिळणार आहे.
केंद्र सरकार हर साल रासायनिक खादों की सब्सिडी पर करीब 80,000 करोड़ रु. खर्च करती है. DAP में सब्सिडी बढ़ाने के साथ ही खरीफ सीजन में भारत सरकार 14,775 करोड़ रू. अतिरिक्त खर्च करेगी…#Aatmanirbharkrishi pic.twitter.com/IaXJ9FVxaX
— Narendra Singh Tomar (@nstomar) May 26, 2021
खतांची सबसिडी कशी मिळवाल ?
याबरोबरच आणखी एक ट्विट करत खतांची सबसिडी कशी मिळवाल ? याबाबत माहिती दिली आहे. सबसिडी मिळवण्यासाठी आधार कार्ड किंवा किसान क्रेडिट कार्डची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर बायोमेट्रिक म्हणजेच तुमच्या हाताचा अंगठा मॅच झाल्यानंतर कंपनीच्या खात्यात सरकार सबसीडीचे 12111 रुपये dbt च्या माध्यमातून खात्यात ट्रान्सफर करेल. शेतकऱ्यांना DAP खताची गोणी 1200 रुपयांना मिळेल.
मुझे खाद पर सब्सिडी आखिर कैसे मिलेगी ?
क्या मुझे खाद की दुकान पर 1200 रूपए ही देकर DAP का एक बैग मिलेगा ?जानिए सब्सिडी पाने के लिए आपको क्या करना होगा…#AatmNirbharKrishi pic.twitter.com/J9GgPnILEj
— Narendra Singh Tomar (@nstomar) May 26, 2021