येत्या दोन दिवसात राज्यातल्या ‘या’ भागात विजांच्या गडगडाटासहीत जोरदार पाऊस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही भागात पावसाने उघडीप दिली असली तरी राज्यात पन्हा पाऊस बरसणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या सिस्टिम मुळे व त्याच्या संभवित पुढच्या 2,3 दिवसात आतल्या दिशेने सरकण्याच्या शक्यतेमुळे,आजपासून म्हणजेच 20 -23 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासहीत तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

दरम्यान के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासात मुंबई, ठाणे आणि रायगडच्या काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली असून अद्यापही या भागात ढग दाटले आहेत. तसेच आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास रडार ने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत रात्रभर तसेच पहाटे ४-६ च्या दरम्यान पाऊस बरसला आहे. परेल, एलिफिन्स्टनच्या बाजूने आता पाऊस सुरु आहे . मुंबई ठाण्यासह कोकणातील काही भागात ढग दाटून आले आहेत.

दिनांक 20

ठाणे,मुंबई ,अहमदनगर, नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, जालना ,जळगाव, धुळे, नाशिक, ठाणे, रायगड, या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दिनांक 21

नाशिक, औरंगाबाद, जळगाव, धुळे, जालना, बीड, लातूर, परभणी, औरंगाबाद, अकोला, वाशीम, यवतमाळ, अहमदनगर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, तसेच सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे, आणि मुंबई या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे

दिनांक 22

नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, बीड, जालना आणि अमरावती या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!