भारताला ASANI चक्रीवादळाचा इशारा ! पहा महाराष्ट्रावर काय होईल परिणाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेने कहर केला असताना आता दुसरीकडे देशातील काही भागाला असानी ASANI चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात हे चक्रीवादळ तयार झाले आहे. आज पहाटे नोंदवलेल्या निरीक्षणानुसार हे वादळ 730 किलोमीटर पोर्ट ब्लेअर, दक्षिणपूर्व विशाखापट्टणम , पुरीचा काही भाग असे १० तारखेपर्यंत उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्याजवळ पोहचण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढच्या ४८ तासानंतर त्याची तीव्रता हळूहळू कमी होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या चक्री वादळाचा महाराष्ट्रास कोणताही धोका नाही.

आज कसे असेल राज्यात हवामान ?


दरम्यान आज राज्यातील हवामानाबाबत बोलायचे झाल्यास आज सकाळी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार गोवा आणि कोकण भागात किंचित ढगाळ हवामान पाहावयास मिळाले आहे. हवामान खात्याच्या नागपूर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज विदर्भामध्ये मात्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे अकोला वाशीम यवतमाळ वर्धा नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटा साठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कुठे किती तापमान ?


दरम्यान राज्यातील बहुतांश शहरांमध्ये तापमानाचा पारा हा चाळीस अंशांच्या पुढेच आहे. दिनांक आठ मे रोजी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार महाराष्ट्रातील नांदेड येथे 41.2, चिकलठाणा 40.2, कोल्हापूर 40 5, परभणी 41.3, नाशिक 39.3, सातारा 40, सोलापूर 41, बारामती 40.5, पुणे 40.7, उस्मानाबाद 42 पॉइंट अमरावती 44, बुलढाणा 41.5, ब्रम्हपुरी 44.९, चंद्रपूर 44.2, गडचिरोली 4२.८, गोंदिया 4२.८, नागपूर वर्धा ४४. २, वाशिम 42.5 इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!