हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा दहा अंशांच्या वर गेला आहे पहाटे गारवा आणि दिवसभर उन्हाचा चटका असं वातावरण राज्यातल्या जनतेला सध्या अनुभवायला मिळत आहे. भारताच्या उत्तर आणि ईशान्य भागांमध्ये सध्या गारपीट आणि पाऊस सुरू आहे. दरम्यान विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात देखील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या हवामान विभागाने वर्तवली होती .
दरम्यान 10 फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि झारखंड, बिहार आणि ओरिसा मध्ये हलक्या ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. तर दहा आणि 11 फेब्रुवारी रोजी पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात जोरदार वारे वाहण्याची शक्यता देखील भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
https://twitter.com/Indiametdept/status/1491303484158713856?s=20&t=S6NOsFFWVdyo5dFAk80upg
आजचे (10 फेब्रुवारी ) राज्यातील किमान तापमान
सोलापूर 19, सातारा 13.9, जळगाव 10.3, कोल्हापूर 16.9, नांदेड 17.8, सांगली 15.9, चिकलठाणा 15.9, मालेगाव बारा ,जेऊर 13, महाबळेश्वर 12.4, डहाणू 19.6, नाशिक 11.4, बारामती 11.8, परभणी 16.2, पुणे 12.4, हरणाई 18.4, रत्नागिरी सतरा ,उस्मानाबाद 16.3, माथेरान 15, डिग्री सेल्सिअस सांताक्रुज 16.5 आणि जालना 15.8 इतक्या किमान तापमानाची नोंद आज(10) सकाळी करण्यात आली आहे.