जख्मी वाघिणीच्या पंजाने चाैकीदार घायाळ ः राजू शेट्टींचा मोदींवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काॅंग्रेसने निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळविले आहे. त्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ममता बॅंनर्जी यांना जख्मी वाघीण असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदीच्यावर हल्लाबोल केला आहे. सोशल मिडियावर राजू शेट्टी एक पोस्ट केली आहे.

राजू शेट्टी आपल्या पोस्टमध्ये म्हणतायत, जख्मी वाघिणीच्या पंजाने चाैकीदार झाला घायाळ असे म्हटले आहे. त्यांनी पश्चिम बंगाल मधील मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल ममता दिदींच अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी आता भाजप विरोधी आघाडीचं नेतृत्व करावं अशी मागणीही केली आहे.

https://www.facebook.com/Rajushetti27/posts/305063124315106

पश्चिम बंगालमध्ये भाजपाला रोखण्यात ममता दिदींना यश आले आहे. त्यामुळे आता त्यांनीच भाजपाविरोधी आघाडीचं नेतृत्व कराव असंही राजू शेट्टी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!