हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांचा निषेध म्हणून आणि हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आज गुरुवारपासून जंतर-मंतर येथे किसान संसदेचं आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती शेतकरी नेते बालबीरसिंग राजेवाल यांनी दिली आहे. बुधवारी याबाबत शेतकरी नेते आणि दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यानंतर ते बोलत होते. दर दिवशी सुमारे दोनशे शेतकरी यात सहभागी होतील अशी माहितीही देण्यात आली आहे.
Parliament is just 150 metres away from Jantar Mantar. We will hold our own Parliament sessions there. What do we have to do with hooliganism? Are we miscreants?: BKU Leader Rakesh Tikait on being asked about arrangements to tackle situations like Jan 26 Red Fort violence pic.twitter.com/srUK3pESHe
— ANI (@ANI) July 22, 2021
बलबिर सिंह राजेवाल याबाबत म्हणाले की, “किसान संसद” बाबत बुधवारी बैठक झाली. आमची भूमिका आम्ही मांडली. प्रशासनाशी झालेल्या चर्चेनुसार दर दिवशी दोन शेतकऱ्यांचा गट जंतर-मंतर येथे जाईल. याबाबत आणखी एक बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आताच काही सांगू शकत नाही. शेतकरी नेते योगेंद्र यादव म्हणाले की शेतकरी युनियनचे नेते आणि दिल्ली पोलिसांची झालेली चर्चा अर्थपूर्ण आणि सकारात्मक चालल्या आज दोन शेतकऱ्यांचा एक गट जंतरमंतर येथे जाईल आणि किसान संसद सुरू होईल. किसान संसद अत्यंत शांततेत होईल असंही त्यांनी म्हटलं.
Delhi: Punjab Congress MPs staged a protest in front of Gandhi Statue in the premises of Parliament, over three farm laws pic.twitter.com/nMgRPNjIjp
— ANI (@ANI) July 22, 2021
दरम्यान दिल्ली पोलिसांनी रविवारी होणाऱ्या निदर्शनांना परवानगी नाकारल्यानंतर बलबीर सिंग म्हणाले, आज संसदेला देण्यात येणारा घेराव हा घातला जाणार नाही. शेतकरी दिल्लीच्या विविध सीमेवर 26 नोव्हेंबर २०२० पासून निदर्शनं करत आहे. त्याच दरम्यान सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही अद्याप मतभेद मिटले नाहीत.