हॅलो कृषी ऑनलाईन: संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना आस लागली आहे ती पावसाची… खरिपाची तयारी सध्या शेतकरी करतो आहे. अशातच मान्सून आणखी ३-४ दिवस लांबणीवर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापूर्वी हवामान खात्यानं मान्सून ३१ तारखेला केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र हवामान खात्याने व्यक्त केलेल्या नव्या अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये तारखेला गुरुवारी दाखल होणार असल्याचे सांगितले आहे. याबरोबरच भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सूनच्या सरी 101% बरसतील असा अंदाज वर्तवला आहे. हवामानाच्या अंदाजानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. भारतात जून ते सप्टेंबर या काळामध्ये मान्सून सरासरीच्या सामान्य राहणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
INDIA METEOROLOGICAL DEPARTMENT
Updated Long Range Forecast
For the 2021Southwest Monsoon Season Rainfall.
For further details pls refer:
In English-https://t.co/9YxV0LFcc0
In Hindi- https://t.co/1drJtRKfmW@rajeevan61 @moesgoi @PIB_India @drharshvardhan pic.twitter.com/m6dVehqGp3— India Meteorological Department (@Indiametdept) June 1, 2021
कोठे किती बरसणार मान्सून?
— मान्सूनचा पाऊस उत्तर पश्चिम भारतात 92-108 टक्के होण्याती शक्यता आहे.
— दख्खनच्या पठारावर 93-107 टक्के पाऊस होऊ शकतो.
–उत्तर पूर्व भारतात 95 टक्के बरसेल.
–मध्य भारतात 106 टक्के पेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यात सरासरीच्या बीबीएम .६ मिलिमीटर च्या तुलनेत 2021 मध्ये १०३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पाच टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्काय मेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागात संपूर्ण हंगामातही पाऊस पडेल.